तुम्ही अॅल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक केलेले अन्न खाताय? तर आताच व्हा सावध नाहीतर...

मुंबई: आजकाल जेवण पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईलचा(aluminium foil) वापर खूप वाढला आहे. मात्र ही अॅल्युमिनियम फॉईल आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. दरम्यान, यामुळे काय नुकसान होते याची माहिती फार कमी लोकांना असते. तुम्हीही जर जेवण अॅल्युमिनियम फॉईलमध्ये जेवण पॅक करत असाल तर जाणून घ्या यामुळे काय नुकसान होते ते.


तज्ञांच्या मते अॅल्युमिनियम फॉईलचा वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेव्हा आपण अॅल्युमिनियम फॉईलचा वापर जेवण गरम ठेवण्यासाठी करतो तेव्हा गरम जेवण अॅल्युमिनियम फॉईलच्या संपर्कात येते आणि ती तत्वे जेवणात उतरतात. दीर्घकाळ असे जेवण जेवल्याने विस्मरणाचा धोका वाढतो.



काय म्हणतात तज्ञ?


तज्ञांच्या मते अॅल्युमिनियम फॉईलमध्ये जेवण पॅक करणे योग्य आहे मात्र दीर्घकाळ याचा वापर करत राहिल्यास ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. खासकरून जेव्हा अॅल्युमिनियम फॉईलमध्ये अॅसिडिक आणि खारट पदार्थ दीर्घकाळ ठेवले जातात. यातील केमिकल रिअॅक्शनमुळे जेवणाची चव बदलू शकते. तसेच लीव्हर आणि किडनीशी संबंधित समस्या होऊ शकतात.



गंभीर आजारांचा धोका


तज्ञांच्या मते, अॅल्युमिनियम फॉईलमध्ये ठेवलेले जेवण दीर्घकाळ सेवन करत राहिल्यास पुरुषांमध्ये इंफर्टिलिटीची गंभीर समस्या वाढे. यामुळे हाडांच्या विकासावरही परिणाम होतो. तसेच किडनीचीही समस्या सतावू शकते. याशिवाय अॅल्युमिनियमच्या भांड्यात जेवण बनवल्याने तसेच ठेवल्याने आणि खाल्ल्याने शरीरात अनेक धोकादायकतत्वे जमा होतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. अस्थमा, लिव्हरच्या समस्या उद्भवतात.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या