Water Shortage : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती; धरणांतील पाणीपातळी चिंताजनक

मुंबई : राज्यात यावर्षी पाऊस हवा तेवढ्या प्रमाणात पडला नाही. परिणामी अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. मराठवाड्यात पाणीटंचाईच्या (Water Shortage) झळा आतापासूनच जाणवू लागल्या आहेत.


गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २०.२५ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट (Water Shortage) झाली आहे. सध्या राज्यातील तीन हजार धरणांतील पाणीसाठा ७६.२० टक्के इतकाच शिल्लक आहे. यामुळे उन्हाळ्यापर्यंत राज्यात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता जलसंपदा विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.


पुणे शहरातही पाण्याची परिस्थिती भविष्यात गंभीर होणार असून मोठा प्रश्न उद्भवणार आहे. आयुक्त, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना एक महिन्यापूर्वी या संदर्भात पत्र लिहून यावर उपाययोजना करण्याची मागणी केली होती, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पाण्याचे साठे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. राज्यात सगळीकडे अशी परिस्थिती आहे. कॅबिनेटमध्ये पाण्याची परिस्थिती सांगितली जाते. राज्यात २ हजार ९९४ लहान-मोठी धरणे असून त्यातील पाणीसाठा दररोज कमी होत आहे.



मुंबईतील धरणांमधील पाणीसाठा


भातसा


गेल्या वर्षी - 82.81


या वर्षी - 77.80


मोडक सागर


गेल्या वर्षी 76.23


या वर्षी 68.05


तानसा


गेल्या वर्षी 84.99


या वर्षी 79.79


मध्य वैतरणा


गेल्या वर्षी 49.57


या वर्षी 47.37



राज्यातील धरणांमधील पाणीसाठा


नागपूर


गेल्या वर्षी 81.01


या वर्षी 70.17


अमरावती


गेल्या वर्षी 86.65


या वर्षी 72.36


संभाजीनगर


गेल्या वर्षी 90.73


या वर्षी 43.42


नाशिक


गेल्या वर्षी 97.21


या वर्षी 73.79


पुणे


गेल्या वर्षी 87.11


या वर्षी 81.17

Comments
Add Comment

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार

Police Suicide : मुंबईच्या लोकभवनात SRPF जवानाची आत्महत्या; गार्ड ड्युटीवर असताना सर्व्हिस रायफलमधून झाडली गोळी

मुंबई : मलबार हिल (Malabar Hill) येथील लोकभवन (Lokbhavan) परिसरात सोमवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. राजभवनाच्या सुरक्षेसाठी

Maharashtra school holiday : मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह अनेक जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे