Rohit Sharma: विश्वचषकानंतर रोहित शर्माची पहिली पत्रकार परिषद, टी-२० वर्ल्डकप खेळण्याचे दिले संकेत

मुंबई: रोहित शर्मा भारतीय कर्णधाराच्या रूपात दक्षिण आप्रिकेत खेळवल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध आहे. २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेआधी भारतीय कर्णधाराने पत्रकार परिषद घेतली. यात त्याने पुढील वर्षी खेळवल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२४मध्ये खेळण्याचे संकेत दिले आहेत. याआधी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की रोहित शर्मा टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा भाग असणार नाही.


पत्रकार परिषदेत रोहित शर्माने सांगितले की माझ्यासमोर आहे मी ते खेळण्यासाठी पाहत आहे. रोहित शर्माच्या या बोलण्यावरून कुठे ना कुठे स्पष्ट होते की तो २०२४मध्ये खेळवल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकामध्ये खेळू शकतो. दरम्यान, याबाबत कोणतेही अधिकृत माहिती मिळालेली नाही. आता हे पाहणं विशेष असणार आहे की रोहित शर्मा २०२४चा टी-२० विश्वचषकत खेळणार की नाही.


भारतीय कर्णधाराशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत केएल राहुलबाबत म्हटले की त्याला केएल राहुलवर विश्वास आहे. तो नंबर चार आणि पाचवर चांगली बॅटिंग करतो. कसोटीत तो विकेटकीपिंग करू शकतो. मला माहीत आहे की तो किती वेळ असे करू शकतो.


रोहित शर्माने संघातील मुख्य वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबाबत म्हटले की गेल्या ५ ते ७ वर्षात भारतीय वेगवान गोलंदाजांनी परदेशी भूमीवर चांगली कामगिरी केली आहे. आम्ही शमीला मिस करू. तरूण खेळाडू त्याची जागा घेण्याचा प्रयत्न करतील. मात्र हे सोपे असणार नाही.


तिसऱ्या गोलंदाजाबाबत भारतीय कर्णधाराने म्हटले की प्रसिद्ध कृष्णा आणि मुकेश कुमार यांनी चांगली कामगिरी केली. बुमराह आणि सिराज आमच्याकडे आहेत. आता हे पाहावे लागेल की आम्हाला स्विंग अथवा सीम कसे गोलंदाज हवेत.

Comments
Add Comment

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.