Rohit Sharma: विश्वचषकानंतर रोहित शर्माची पहिली पत्रकार परिषद, टी-२० वर्ल्डकप खेळण्याचे दिले संकेत

Share

मुंबई: रोहित शर्मा भारतीय कर्णधाराच्या रूपात दक्षिण आप्रिकेत खेळवल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध आहे. २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेआधी भारतीय कर्णधाराने पत्रकार परिषद घेतली. यात त्याने पुढील वर्षी खेळवल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२४मध्ये खेळण्याचे संकेत दिले आहेत. याआधी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की रोहित शर्मा टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा भाग असणार नाही.

पत्रकार परिषदेत रोहित शर्माने सांगितले की माझ्यासमोर आहे मी ते खेळण्यासाठी पाहत आहे. रोहित शर्माच्या या बोलण्यावरून कुठे ना कुठे स्पष्ट होते की तो २०२४मध्ये खेळवल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकामध्ये खेळू शकतो. दरम्यान, याबाबत कोणतेही अधिकृत माहिती मिळालेली नाही. आता हे पाहणं विशेष असणार आहे की रोहित शर्मा २०२४चा टी-२० विश्वचषकत खेळणार की नाही.

भारतीय कर्णधाराशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत केएल राहुलबाबत म्हटले की त्याला केएल राहुलवर विश्वास आहे. तो नंबर चार आणि पाचवर चांगली बॅटिंग करतो. कसोटीत तो विकेटकीपिंग करू शकतो. मला माहीत आहे की तो किती वेळ असे करू शकतो.

रोहित शर्माने संघातील मुख्य वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबाबत म्हटले की गेल्या ५ ते ७ वर्षात भारतीय वेगवान गोलंदाजांनी परदेशी भूमीवर चांगली कामगिरी केली आहे. आम्ही शमीला मिस करू. तरूण खेळाडू त्याची जागा घेण्याचा प्रयत्न करतील. मात्र हे सोपे असणार नाही.

तिसऱ्या गोलंदाजाबाबत भारतीय कर्णधाराने म्हटले की प्रसिद्ध कृष्णा आणि मुकेश कुमार यांनी चांगली कामगिरी केली. बुमराह आणि सिराज आमच्याकडे आहेत. आता हे पाहावे लागेल की आम्हाला स्विंग अथवा सीम कसे गोलंदाज हवेत.

Tags: Rohit Sharma

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

23 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

51 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

1 hour ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago