हातात पुस्तक घेतल्यावर झोप येते तर जरूर ट्राय करा या टिप्स, कधीच येणार नाही सुस्ती

  156

मुंबई: अभ्यास करता अनेकदा पुस्तके हातात घेतल्यावर तुमच्या मुलालाही झोप(sleep) येते का? मुलांमध्येच नाही तर मोठ्यांमध्येही ही समस्या पाहायला मिळते. अनेकदा पुस्तक वाचायचे असते मात्र ते हातात घेतल्यावर झोप येते. तुम्हालाही असेच होत असेल तर जरूर ट्राय करा खाली दिलेल्या टिप्स...



पुस्तके हातात घेताच का येते झोप


जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा डोळ्यांशी संबंधित स्नायूंवर ताण येतो. आपला मेंदू वाचलेल्या गोष्टी आठवून त्या एकत्रित साठवण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा डोळ्यांचे स्नायू थकतात अथवा मंद गतीने काम करतात तेव्हा झोप येऊ लागते. अनेकदा अभ्यास करताना आपली बसण्याची स्थिती चुकीची असल्यास झोप येऊ शकते. येथेही तसेच होते आपण बस अथवा ट्रेनमध्येही बसल्या बसल्या झोपतो. त्यामुळे अभ्यासादरम्यान बॉडीचे पोस्चर अशा पद्धतीने ठेवा की ज्यामुळे खूप आरामदायक वाटणार नाही. तसेच त्यामुळे सुस्तीही येणार नाही.



अंधारात अभ्यास करू नका


जेव्हा तुम्हीही अभ्यासाला बसाल तेव्हा अशी जागा निवडा येथे पुरेसा उजेड असेल. यामुळे डोळ्यांवर कमी ताण येईल आणि सुस्ती जाणवणार नाही.



खुल्या जागेत अभ्यास करा


खुल्या जागा जसे छत, बाल्करनीमध्ये हवा आणि उजेड चांगला असतो यामुळे अशा ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. यामुळे कमी सुस्ती येईल. तसेच झोपही येणार नाही.



अंथरूणावर झोपून अभ्यास करू नका


काही जणांना अंथरूणावर बसून अभ्यास करण्याची सवय असते. असे केल्याने आळस आणि सुस्ती जाणवते. यामुळे अभ्यासात मन लागत नाही. त्यामुळे अभ्यास करताना टेबल-खुर्चीवर बसून करा.



अभ्यासाआधी हलके जेवण घ्या


अधिक आणि झोप येणे स्वाभाविक आहे. अशातच जेवण जेवल्यानंतर लगेचच अभ्यासाला बसू नका. हलके आणि पचेल असे जेवण घ्या. खाल्ल्याने सुस्ती येणार नाही.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.