India vs Australia Women : भारतीय महिला संघाने तब्बल दहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मारली बाजी!

मुंबई : क्रिकेट विश्वचषकाच्या (Cricket Worldcup) अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा (India vs Australia) दारुण पराभव झाला. मात्र, आपली मान पुन्हा एकदा उंचावण्यासाठी नारीशक्ती धावून आली. भारताच्या महिला क्रिकेट संघाने (Indian Women Cricket team) मुंबईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल दहा वर्षांनंतर सामना जिंकत इतिहास रचला आहे. गेल्या दहा वर्षांत ऑस्ट्रेलियाने एकदाही भारताला जिंकण्याची संधी दिली नव्हती, मात्र यावेळेस भारताच्या रणरागिणींनी त्यांना पहिल्यांदा पराभव स्विकारायला लावला आहे.


महिला क्रिकेटमध्ये, मुंबईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१९ धावा आणि दुसऱ्या डावात २६१ धावा केल्या. तर भारताने पहिल्याच डावात ४०६ धावा ठोकल्या, त्यामुळे दुसऱ्या डावात अवघ्या ७५ धावांचे माफक आव्हान भारताला पूर्ण करायचे होते. केवळ दोन गडी गमावून भारताने ते पूर्ण करत विजय मिळवला.


ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ताहिलाने अर्धशतक झळकावले, तर ताहिलाने दुसऱ्या डावातही ७३ धावा करत उत्तम योगदान दिले. या कालावधीत तिने १० चौकार मारले. ऑस्ट्रेलियन संघासाठी एलिस पेरीने ४५ धावांची कामगिरी केली.


भारतासाठी स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रेणुका सिंग आणि स्नेह राणा यांनी चमकदार कामगिरी केली. भारताकडून पूजा वस्त्राकरने पहिल्या डावात ४ बळी घेतले. तिने १६ षटकात ५३ धावा दिल्या. तर स्नेह राणाने २२.४ षटकात ५६ धावा देत ३ बळी घेतले. दीप्ती शर्माने २ बळी घेतले. स्नेहने दुसऱ्या डावात ४ बळी घेतले. तिने २२ षटकात ६३ धावा दिल्या. राजेश्वर गायकवाड आणि हरमनप्रीतनेही प्रत्येकी दोन गडी बाद केले. पूजाला एक विकेट मिळाली. या उत्तम कामगिरीमुळे भारताचा महिलांच्या कसोटी सामन्यात विजय झाला.


Comments
Add Comment

मध्यपूर्व देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी

दिल्ली: मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या

Israel - Iran War : भारतीय दूतावासाकडून इस्रायलमधील नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण – इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आंध्र प्रदेशच्या काकीनाड्यातील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; १८ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेश राज्यातील काकीनाडा जिल्हा येथील सामरलकोट मंडलमधील वेटलापालेम गावात एका फटाका निर्मिती

INS Anjdip : शत्रूला धडकी भरणार! 'आयएनएस अंजदीप' भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

चेन्नई : आयएनएस अंजदीप, ही पाणबुडी विरोधी युद्धनौका , ‘शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) प्रकल्पातील

National Science Day 2026 : विकास आणि कल्याणासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करा - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा देत भारताच्या

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील