Google Employees: गुगलच्या या ३० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट

नवी दिल्ली: जगातील दिग्गज टेक कंपनी गुगलमध्ये(google) पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या कपातीचे संकट आले आहे. कंपनीने या वर्षाच्या सुरूवातीला १२००० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. ही कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी कपात होती. आता गुगल आपल्या जाहिरातीच्या सेल्स युनिटमध्ये बदल करत आहे. यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा कपात प्रक्रियेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. या डिपार्टमध्ये ३० हजार लोक काम करतात.



सुंदर पिचाईे कपातीची पद्धत चुकीची असल्याचे सांगितले होते


गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकतेच म्हटले होते की कपातीची प्रक्रिया कंपनीने योग्य पद्धतीने केली नाही. दरम्यान कपात ही कंपनीच्या भविष्याच्या दृष्टीने महत्तवाची असल्याचे म्हटले होते. जर असे केले नसते तर पुढे जाऊन गुगलला खूप दुष्परिणाम भोगावे लागले असते. दरम्यान २०२३च्या सुरूवातीला झालेल्या कपातीनंतर कोणालाही काढण्यात आले नाही.



का होऊ शकते कपात?


गुगल सातत्याने आर्टिफिशियल इंटीलिजेन्समध्ये गुंतवणूक करत आहे. याशिवाय कंपनी मशीन लर्निंगचा वापर अॅड परचेसमध्ये करत आहे. एआयच्या वापरामुळे सगळीकडेच लोकांच्या नोकरीवर संकट निर्माण झाले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. जर कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले नाही तर त्यांना दुसऱ्या विभागात शिफ्ट केले जाऊ शकते. गुगलने याबाबत कोणतेही विधान केलेले नाही.

Comments
Add Comment

Karnataka News : पावसात ४० वर्षांचं चंदनाचं झाड कोसळलं; ८५ वर्षीय वृद्ध लखपती!

कर्नाटक : पावसाळ्यात (Monsoon) मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि तुफान वाऱ्यांमुळे (Strong Winds) झाडं कोसळल्याच्या घटना वारंवार घडतात. अशा

Devendra Fadnavis : नर्मदेतून महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी

वीस वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बैठक मुंबई : केंद्रीय

India Indonesia Agreements : भारत-इंडोनेशियात संरक्षण, खनिज, बंदर विकासासह अनेक महत्त्वाचे करार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याला मोठे यश जकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया

INS Mahendragiri : अण्वस्त्र सज्ज ‘आयएनएस महेंद्रगिरी’ शनिवारी ताफ्यात

आव्हानांच्या पार्श्वभूमीवर नौदलाची सागरी सुरक्षा अधिक मजबूत होणार नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाकडून सर्वोच्च नागरी सन्मान ‘बिंतांग आदिपूर्णा’ पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी देशातील

Taj Mahal : ताजमहाल ‘तेजो महालय’ होता का ? हायकोर्टाने केंद्र सरकार आणि एएसआयकडे मागितले उत्तर

प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील ताजमहाल हे मूळचे 'तेजो महालय' हिंदू मंदिर होते का, या दाव्याशी संबंधित