Google Employees: गुगलच्या या ३० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट

नवी दिल्ली: जगातील दिग्गज टेक कंपनी गुगलमध्ये(google) पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या कपातीचे संकट आले आहे. कंपनीने या वर्षाच्या सुरूवातीला १२००० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. ही कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी कपात होती. आता गुगल आपल्या जाहिरातीच्या सेल्स युनिटमध्ये बदल करत आहे. यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा कपात प्रक्रियेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. या डिपार्टमध्ये ३० हजार लोक काम करतात.



सुंदर पिचाईे कपातीची पद्धत चुकीची असल्याचे सांगितले होते


गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकतेच म्हटले होते की कपातीची प्रक्रिया कंपनीने योग्य पद्धतीने केली नाही. दरम्यान कपात ही कंपनीच्या भविष्याच्या दृष्टीने महत्तवाची असल्याचे म्हटले होते. जर असे केले नसते तर पुढे जाऊन गुगलला खूप दुष्परिणाम भोगावे लागले असते. दरम्यान २०२३च्या सुरूवातीला झालेल्या कपातीनंतर कोणालाही काढण्यात आले नाही.



का होऊ शकते कपात?


गुगल सातत्याने आर्टिफिशियल इंटीलिजेन्समध्ये गुंतवणूक करत आहे. याशिवाय कंपनी मशीन लर्निंगचा वापर अॅड परचेसमध्ये करत आहे. एआयच्या वापरामुळे सगळीकडेच लोकांच्या नोकरीवर संकट निर्माण झाले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. जर कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले नाही तर त्यांना दुसऱ्या विभागात शिफ्ट केले जाऊ शकते. गुगलने याबाबत कोणतेही विधान केलेले नाही.

Comments
Add Comment

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या

US-India Trade Deal: वर्षभराच्या चर्चेनंतर भारत-अमेरिका व्यापार करारावर एकमत; ट्रम्प-मोदींच्या चर्चेनंतर 'टॅरिफ'मध्ये मोठी कपात

भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः पंतप्रधान