Quatar : कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेले ८ भारतीय मायदेशात परतणार? परराष्ट्र मंत्रालयाने दिली ही माहिती

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी गुरूवारी सांगितले की भारतीय नौदलाच्या ८ माजी कर्मचाऱ्यांद्वारे दाखल केलेल्या याचिकेवर कतारमधील न्यायालयाने तीन वेळा सुनावणी केली. माजी कर्मचाऱ्यांनी मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात ही याचिका दाखल केली होती. बागची म्हणाले की भारत त्यांना सकुशलपणे परत आणण्यासाठी काम करत आहे. आठ माजी कर्मजाऱ्यांना गुप्तहेरीप्रकरणी तुरुंगात ठेवले आहे.


अरिंदम बागची यांनी मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की कतारच्या राजांनी १८ डिसेंबरला देशातील नॅशनल डे निमित्ताने भारतीय नागरिकांसह अनेक कैद्यांना माफ केले. मात्र भारताला हे माहीत नाही आहे की ज्या लोकांना माफी मिळाली आहे त्यांची ओळख काय आहे. याच कारणामुळे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही की माफी करण्यात आलेल्या लोकांमध्ये भारताच्या या माजी नौदल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे की नाही.



काय म्हणाले परराष्ट्र मंत्रालय?


हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, भारतीय नागरिकांशी संबंधित एका प्रश्नाचे उत्तर देताना अरिंदम बागची म्हणाले, हे प्रकरण आता कतारच्या कोर्टात अपीलमध्ये आहे आणि २३ नोव्हेंबर, ३० नोव्हेंबर आणि ७ डिसेंबरला ही तीन वेळा सुनावणी झाली. यातच दोहामध्ये उपस्थित आमच्या राजदूतांना ३ डिसेंबरला या सर्व लोकांना भेटण्यासाठी काऊंसिलर अॅक्सेस मिळाला.



ऑक्टोबरमध्ये मिळाली मृत्यूदंडाची शिक्षा


कतारच्या न्यायालयाने ज्या आठ भारतीय नागरिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे त्यात असे अधिकारी सामील आहेत ज्यांनी भारतीय नौदलात फ्रंटलाईन वॉरशिपवर काम केले आहे. २६ ऑक्टोबरला कतारच्या न्यायालयाने या ८ लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. शिक्षेआधी यांना कोणत्याही खटल्याशिवाय एक वर्षे ताब्यात ठेवण्यात आले होते. रिपोर्ट्समध्ये या लोकांवर गुप्तहेरी केल्याचे आरोप होते.

Comments
Add Comment

'तेल खरेदीसाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही'

रशियाकडून खरेदीबाबत भारत ठाम नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जिथे मिळेल तिथून कमीत कमी किमतीत तेल खरेदी करेल.

पश्चिम आशियातील युद्धाचा साखर उद्योगाला फटका

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता देशातील साखर उद्योगापर्यंत

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

Gas Cylinder Price Hike :देशभरात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

- घरगुती आणि कमर्शिअल दोन्हीचे दर वाढले मुंबई : देशभरात घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही गॅस सिलेंडरच्या दरात आज,

आंध्र प्रदेशात आता ‘हम दो, हमारे तीन’!

अमरावती (वृत्तसंस्था) : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू असतानाच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.

आखातातील युद्धाने एलएनजी महाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे सध्या आखाती देशांमध्ये तणावपूर्ण