Quatar : कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेले ८ भारतीय मायदेशात परतणार? परराष्ट्र मंत्रालयाने दिली ही माहिती

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी गुरूवारी सांगितले की भारतीय नौदलाच्या ८ माजी कर्मचाऱ्यांद्वारे दाखल केलेल्या याचिकेवर कतारमधील न्यायालयाने तीन वेळा सुनावणी केली. माजी कर्मचाऱ्यांनी मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात ही याचिका दाखल केली होती. बागची म्हणाले की भारत त्यांना सकुशलपणे परत आणण्यासाठी काम करत आहे. आठ माजी कर्मजाऱ्यांना गुप्तहेरीप्रकरणी तुरुंगात ठेवले आहे.


अरिंदम बागची यांनी मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की कतारच्या राजांनी १८ डिसेंबरला देशातील नॅशनल डे निमित्ताने भारतीय नागरिकांसह अनेक कैद्यांना माफ केले. मात्र भारताला हे माहीत नाही आहे की ज्या लोकांना माफी मिळाली आहे त्यांची ओळख काय आहे. याच कारणामुळे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही की माफी करण्यात आलेल्या लोकांमध्ये भारताच्या या माजी नौदल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे की नाही.



काय म्हणाले परराष्ट्र मंत्रालय?


हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, भारतीय नागरिकांशी संबंधित एका प्रश्नाचे उत्तर देताना अरिंदम बागची म्हणाले, हे प्रकरण आता कतारच्या कोर्टात अपीलमध्ये आहे आणि २३ नोव्हेंबर, ३० नोव्हेंबर आणि ७ डिसेंबरला ही तीन वेळा सुनावणी झाली. यातच दोहामध्ये उपस्थित आमच्या राजदूतांना ३ डिसेंबरला या सर्व लोकांना भेटण्यासाठी काऊंसिलर अॅक्सेस मिळाला.



ऑक्टोबरमध्ये मिळाली मृत्यूदंडाची शिक्षा


कतारच्या न्यायालयाने ज्या आठ भारतीय नागरिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे त्यात असे अधिकारी सामील आहेत ज्यांनी भारतीय नौदलात फ्रंटलाईन वॉरशिपवर काम केले आहे. २६ ऑक्टोबरला कतारच्या न्यायालयाने या ८ लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. शिक्षेआधी यांना कोणत्याही खटल्याशिवाय एक वर्षे ताब्यात ठेवण्यात आले होते. रिपोर्ट्समध्ये या लोकांवर गुप्तहेरी केल्याचे आरोप होते.

Comments
Add Comment

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये