Quatar : कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेले ८ भारतीय मायदेशात परतणार? परराष्ट्र मंत्रालयाने दिली ही माहिती

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी गुरूवारी सांगितले की भारतीय नौदलाच्या ८ माजी कर्मचाऱ्यांद्वारे दाखल केलेल्या याचिकेवर कतारमधील न्यायालयाने तीन वेळा सुनावणी केली. माजी कर्मचाऱ्यांनी मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात ही याचिका दाखल केली होती. बागची म्हणाले की भारत त्यांना सकुशलपणे परत आणण्यासाठी काम करत आहे. आठ माजी कर्मजाऱ्यांना गुप्तहेरीप्रकरणी तुरुंगात ठेवले आहे.


अरिंदम बागची यांनी मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की कतारच्या राजांनी १८ डिसेंबरला देशातील नॅशनल डे निमित्ताने भारतीय नागरिकांसह अनेक कैद्यांना माफ केले. मात्र भारताला हे माहीत नाही आहे की ज्या लोकांना माफी मिळाली आहे त्यांची ओळख काय आहे. याच कारणामुळे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही की माफी करण्यात आलेल्या लोकांमध्ये भारताच्या या माजी नौदल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे की नाही.



काय म्हणाले परराष्ट्र मंत्रालय?


हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, भारतीय नागरिकांशी संबंधित एका प्रश्नाचे उत्तर देताना अरिंदम बागची म्हणाले, हे प्रकरण आता कतारच्या कोर्टात अपीलमध्ये आहे आणि २३ नोव्हेंबर, ३० नोव्हेंबर आणि ७ डिसेंबरला ही तीन वेळा सुनावणी झाली. यातच दोहामध्ये उपस्थित आमच्या राजदूतांना ३ डिसेंबरला या सर्व लोकांना भेटण्यासाठी काऊंसिलर अॅक्सेस मिळाला.



ऑक्टोबरमध्ये मिळाली मृत्यूदंडाची शिक्षा


कतारच्या न्यायालयाने ज्या आठ भारतीय नागरिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे त्यात असे अधिकारी सामील आहेत ज्यांनी भारतीय नौदलात फ्रंटलाईन वॉरशिपवर काम केले आहे. २६ ऑक्टोबरला कतारच्या न्यायालयाने या ८ लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. शिक्षेआधी यांना कोणत्याही खटल्याशिवाय एक वर्षे ताब्यात ठेवण्यात आले होते. रिपोर्ट्समध्ये या लोकांवर गुप्तहेरी केल्याचे आरोप होते.

Comments
Add Comment

रेल्वेतून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी ई - बाईक !

रेल्वेची रस्त्यावरही सेवा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर ई-बाईक भाड्याने देण्याची सेवा

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना

देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना

११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत