चाळीसगावात लग्नातील जेवणातून १००हून अधिक वऱ्हाडींना विषबाधा

चाळीसगाव (प्रतिनिधी)- चाळीसगाव(chalisgaon) येथील हिरापूर रोडवरील एका लॉन्समध्ये लग्नातील वऱ्हाडींना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वर आणि वधूकडील तब्बल १०० पेक्षा अधिक वऱ्हाडींना सौम्य प्रकारची विषबाधा झाली असून त्यातील अनेक वऱ्हाडींवर चाळीसगाव येथे वेगवेगळ्या खाजगी रूग्णालयांमध्ये तर वधूकडील वऱ्हाडींवर जळगाव तालुक्यातील दापोरे येथे आरोग्य विभागाकडून उपचार सुरू आहेत.


दापोऱ्यात सकाळपासून आरेाग्य विभागाचे पथक तळ ठोकून आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहर पोलीसांनी रूग्णालयांमध्ये जावून विषबाधा झालेल्या वऱ्हाडींचे जाब जबाब घेऊन विषबाधेचे कारण जाणून घेतले. तर अन्न आणि अन्न निरीक्षकांनी लग्नातील जेवणाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी नाशिक येथे पाठवले आहेत.


घटनेची माहिती अशी की, हिरापूर येथील मुलाचा विवाह गुरूवारी जळगाव तालुक्यातील दापोरे येथील मुलीशी चाळीसगाव येथील हिरापूर रेाडवरील सुयश लॉन्समध्ये पार पडला.या विवाहाला वधू व वर अशा दोघांकडील वऱ्हाडी मोठ्या संख्येने आली होती.


लग्नानंतर दुपारी वऱ्हाडींनी डाळभात, शेवपुरी, गुलाबजाम, छोले वांगे जिलबी असा जेवणाचा आस्वाद घेतला. लग्नानंतर वधू व वरांकडील वऱ्हाडी आपापल्या घरी गेले.मात्र सायंकाळी या वऱ्हाडींना अचानक जुलाब, उलट्या होवू लागल्या.वऱ्हाडींना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार लक्षात येताच या विषबाधीत झालेल्यांना तात्काळ चाळीसगाव शहरातील विविध पाच ते सहा रूग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.


चाळीसगाव शहरातील रूग्णालयांमध्ये वऱ्हाडींवर सध्या उपचार सुरू असून त्यांनी प्रकृती स्थिर असल्याचे तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. आरोग्य विभाग या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. लग्नातील वऱ्हाडींना विषबाधा झाल्याचा प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक विशाल टकले, पोलीस नाईक राकेश पाटील व सहकाऱ्यंानी खाजगी रूग्णालयांमध्ये धाव घेऊन विषबाधीत रूग्णांचे जाबजबाब घेतले.



अन्न पदार्थ तपासणीसाठी नाशिकला


दरम्यान लग्नात जेवणानंतर सुमारे २०० हून अधिक वऱ्हाडींना विषबाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने मंगल कार्यालयातील डाळभात, शेवपुरी, गुलाबजाम, जिलेबी, छोले वांगे आदी अन्न पदार्थ व पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी नाशिक येथे प्रयोगशाळेत पाठवले.हा अहवाल आल्यानंतरच विषबाधेचे खरे कारण समजून येणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींचा अंदाज; २५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात रविवारचा दिवस पावसाळी ठरण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली