Terrorist attack: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या(jammu-kashmir) पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर गुरूवारी हल्ला केला. दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर गोळीबार केला. यात तीन जवान शहीद झाले आहेत तर तीन जवान जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराच्या वृत्ताला दुजोरा दिला. राजौरीच्या थानामंडीच्या डेरा की गलीमध्ये २० डिसेंबरच्या रात्रीपासून ऑपरेशन सुरू होते. २१ डिसेंबरच्या दुपारी ३.४५ मिनिटांनी लष्कराच्या दोन गाड्या जेव्हा सैन्याला घेऊन ऑपरेशन एरियामध्ये जात होते तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी याला प्रत्युत्तर दिले.


 


अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार थानामंडी-सूरनकोट रोडवर सावनी परिसरात लष्कराच्या वाहनावर हल्ला झाला. त्यांनी सांगितले, हे वाहन बुफलियाज येथून लष्कराच्या जवानांना घेऊन जात होते. बुफलियाजमध्ये दहशतवाद्यांविरोधात घेराबंदी तसेच तपास अभियान बुधवारपासून सुरू आहे.



काय म्हटलं लष्कराने?


लष्कराच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार या परिसरात चकमक सुरू आहे. अतिरिक्त जवानांना घटनास्थळी पाठवले जात आहे.

Comments
Add Comment

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक