Terrorist attack: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या(jammu-kashmir) पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर गुरूवारी हल्ला केला. दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर गोळीबार केला. यात तीन जवान शहीद झाले आहेत तर तीन जवान जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराच्या वृत्ताला दुजोरा दिला. राजौरीच्या थानामंडीच्या डेरा की गलीमध्ये २० डिसेंबरच्या रात्रीपासून ऑपरेशन सुरू होते. २१ डिसेंबरच्या दुपारी ३.४५ मिनिटांनी लष्कराच्या दोन गाड्या जेव्हा सैन्याला घेऊन ऑपरेशन एरियामध्ये जात होते तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी याला प्रत्युत्तर दिले.


 


अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार थानामंडी-सूरनकोट रोडवर सावनी परिसरात लष्कराच्या वाहनावर हल्ला झाला. त्यांनी सांगितले, हे वाहन बुफलियाज येथून लष्कराच्या जवानांना घेऊन जात होते. बुफलियाजमध्ये दहशतवाद्यांविरोधात घेराबंदी तसेच तपास अभियान बुधवारपासून सुरू आहे.



काय म्हटलं लष्कराने?


लष्कराच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार या परिसरात चकमक सुरू आहे. अतिरिक्त जवानांना घटनास्थळी पाठवले जात आहे.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर