वाडा : वाडा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवार, दि. १८ डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने सर्वच ग्रामपंचायतींचे कामकाज बंद झाले आहे. या आंदोलनामध्ये ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक, रोजगार सेवक आदी सहभागी झाले आहेत. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन ग्रामसेवक संघटनेच्या वतीने तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या या काम बंद आंदोलनाने मात्र नागरिकांची गैरसोय होणार आहे.
वित्त आयोगाचा निधी छोट्या ग्रामपंचायतींना दरवर्षी किमान दहा लाख रुपये असावे, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दोन्ही पद एकत्र करून पंचायत विस्तार अधिकारी पद निर्माण करावे, ग्रामसेवक संघटनेला विधान परिषदेत प्रतिनिधित्व द्यावे, रोजगार सेवकांना १५००० फिक्स मानधन द्यावे, विमा संरक्षण द्यावे, विनाकारण कामावरून काढलेल्या रोजगार सेवकांना परत कामावर घेणे आदी विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर हे आंदोलन सुरू करण्यात आले असल्याची माहिती ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी पंकज चौधरी यांनी यावेळी दिली.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…