वाड्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

वाडा : वाडा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवार, दि. १८ डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने सर्वच ग्रामपंचायतींचे कामकाज बंद झाले आहे. या आंदोलनामध्ये ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक, रोजगार सेवक आदी सहभागी झाले आहेत. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन ग्रामसेवक संघटनेच्या वतीने तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या या काम बंद आंदोलनाने मात्र नागरिकांची गैरसोय होणार आहे.


वित्त आयोगाचा निधी छोट्या ग्रामपंचायतींना दरवर्षी किमान दहा लाख रुपये असावे, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दोन्ही पद एकत्र करून पंचायत विस्तार अधिकारी पद निर्माण करावे, ग्रामसेवक संघटनेला विधान परिषदेत प्रतिनिधित्व द्यावे, रोजगार सेवकांना १५००० फिक्स मानधन द्यावे, विमा संरक्षण द्यावे, विनाकारण कामावरून काढलेल्या रोजगार सेवकांना परत कामावर घेणे आदी विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर हे आंदोलन सुरू करण्यात आले असल्याची माहिती ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी पंकज चौधरी यांनी यावेळी दिली.

Comments
Add Comment

भारती एअरटेलने ‘एअरटेल क्लाउड' साठी आयबीएमसोबत धोरणात्मक भागीदारी

नवी दिल्ली:भारती एअरटेलने त्यांच्या नुकत्याच सुरू केलेल्या एअरटेल क्लाउडला सक्षम करण्यासाठी आयबीएमसोबत

विरारमध्ये १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या; प्रियकराच्या ब्लॅकमेलिंग आणि छळामुळे उचलले टोकाचे पाऊल

विरार: विरार परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने राहत्या इमारतीच्या चौथ्या

'आशा' सेविकेच्या संघर्षाची कथा लवकरच पडद्यावर! रिंकूचा आगामी चित्रपट डिसेंबरमध्ये येणार भेटीला

मुंबई: ‘सैराट’ मधील ‘आर्ची’ या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करणारी रिंकू राजगुरू पुन्हा एकदा नव्या

महापालिकेच्या ३० निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारमय, आयुक्तांच्या हृदयाला कधी फुटणार पाझर...

मुंबई, खास प्रतिनिधी : मुंबई महापालिकेच्या तब्बल ३० हून अधिक सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना आज सेवा निवृत्तीच्या

चंद्रावर स्वारी... भारत २०४० चंद्रावर पाठविणार मानव!

रांची  :भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी घोषणा केली की भारताचे उद्दिष्ट २०४०

पालघरमध्ये एसटी बससेवेची स्थिती बिकट

नवीन बस पुरवाव्यात अशी सरनाईक यांच्याकडे मागणी पालघर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील (एस.टी.)