IND vs SA: अर्शदीप-आवेशनंतर भारतीय फलंदाजांचे वादळ, एकतर्फी सामन्यात आफ्रिकेला ८ विकेटनी हरवले

जोहान्सबर्ग: जोहान्सबर्गमध्ये खेळवण्यात आलेल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ८ विकेटनी हरवले. या सामन्यात आधी भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि आवेश खान यांनी कहर केला. त्यानंतर साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यरने तुफानी फलंदाजी केली. या सामन्यात आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ११६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य १७व्या ओव्हरमध्येच मिळवले.


दी वांडरर्समध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात पिचची वेगवान गोलंदाजांना साथ मिळाली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये अर्शदीप सिंहने रीजा हेंडरिक्सला बोल्ड केले. पुढील बॉलवर रासी वान डेर डुसेनलाही अर्शदीपने बाद केले. ४२ धावा झालेल्या असताना टोनी डी जॉर्जीला अर्शदीपने बाद केले. स्कोरबोर्डवर १० धावा आणखी झालेल्या असताना हेनरिक क्लासेनलाही बाद केले. त्यालाही अर्शदीपने बाद केले. या पद्धतीने पहिल्या चार विकेट अर्शदीपने मिळवल्या.



त्यानंतर आवेश खानचा कहर


अर्शदीपनंतर आफ्रिकेलाच्या संघाला आवेश खानने बॅक टू बॅक झटके दिले. ५२ धावसंख्या असताना एडन मार्करमला बोल्ड केले. पुढील बॉलवर आवेशने विआन मुल्डरला एलबीडब्लू केले. डेविड मिलररही झटपट बाद झाला. त्यालाही आवेश खानने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या पद्धतीने ५८ धावांवर आफ्रिकेच्या संघाने ७ विकेट गमावल्या होत्या.


त्यानंतर आंदिले फेहलुखवायोने एक बाजू सांभाळली. त्याने केशव महाराजसह १५ आणि नंद्रे बर्गरसोबत २८ धावांची भागीदारी केली. त्यांतर आंदिले फेहलुखवायोला अर्शदीपने बाद केले. भारतासाठी अर्शदीपने पाच, आवेश खानने चार आणि कुलदीप यादवने एक विकेट घेतला.



साई आणि श्रेयसची जबरदस्त खेळी


११७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाडला लवकर गमावले. त्याने केवळ ५ धावा केल्या. मात्र त्यानंतर श्रेयस अय्यर आणि साई सुदर्शन यांच्यात ८८ धावांची भागीदारी झाली. १११ धावसंख्या असताना श्रेयस अय्यर बाद झाला. त्याने ४५ बॉलमध्ये ५२ धावा केल्या. साई सुदर्शन ४३ बॉलवर ५५ धावा करत बाद झाला. टीम इंडियाने २ विकेट गमावत १६.४ ओव्हरमध्ये आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे