Prabhas in Salaar : 'सालार' चित्रपटासाठी प्रभासने २०-३० नव्हे तर घेतले तब्बल 'इतक्या' कोटींचे मानधन!

दिग्दर्शकानेही घेतलाय चांगलाच पैसा


मुंबई : 'बाहुबली' (Bahubali) या सिनेमातून खरी ओळख मिळालेला दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या भरभरुन कमाई करत आहे. एक सौ एक हिट सिनेमे बाहुबलीनंतर त्याच्या वाट्याला आले. त्याने 'राधेश्याम', 'साहो', 'आदिपुरुष' अशा सिनेमांतून बक्कळ कमाई केली. आता त्याचा आगामी सिनेमा 'सालार'ची (Salaar) चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, या सिनेमासाठी प्रभासने घेतलेलं मानधन ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 'सालार'साठी प्रभासने तब्बल १०० कोटी रुपये इतकं मानधन घेतलं आहे. शिवाय सिनेमाच्या यशातले १० टक्केही तो घेणार आहे. हा बिग बजेट सिनेमा चाहत्यांनाही नक्कीच सिनेमागृहात खेचून आणणार आहे.


केवळ प्रभासच नव्हे तर सालारच्या संपूर्ण स्टारकास्टने यासाठी तगडं मानधन स्विकारलं आहे. या सिनेमात मुख्य नायिका साकारणारी श्रुती हसनने (Shruti Hasan) मात्र प्रभासच्या तुलनेत फारच कमी मानधन घेतलं आहे. या चित्रपटासाठी तिला ८ कोटी रुपयांचं मानधन देण्यात आलं आहे. यासोबतच पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) आणि जगपती बाबू महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या दोघांनीही ४ कोटी रुपयांचं मानधन स्विकारलं आहे. प्रशांत नील (Prashanth Neel) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'केजीएफ', 'केजीएफ २' सारखे तगडे सिनेमे देणार्‍या प्रशांत नील यांनी या सिनेमासाठी ५० कोटी रुपये चार्ज केले आहेत.


सालार' या सिनेमाची निर्मिती ४०० कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. 'सालार' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला (Advanced Booking) आता सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या सिनेमाची २२ हजार ११७ तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे रिलीजआधी या सिनेमाने ४९.३५ लाख रुपयांची कमाई केली आहे. तेलुगू, मल्याळम आणि तामिळमध्येही या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चांगलाच धमाका केला आहे.


प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार' या सिनेमाला 'A' सर्टिफिकेट मिळालं आहे. २ तास ५५ मिनिटांच्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) सिनेमासोबत या सिनेमाची टक्कर होणार आहे. 'सालार'नंतर प्रभास दीपिका पादुकोण, कमल हासन आणि अमिताभ बच्चन यांच्या 'कल्कि २८९८ एडी' या सिनेमात झळकणार आहे. हा बिग बजेट पॅन इंडिया सिनेमा आहे.


Comments
Add Comment

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या

आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री

तिबेटशी व्यापार करणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी

पिथोरगड : भारतीय व्यावसायिक जून २०२६ पासून तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार

विमान प्रवास महागणार? देशांतर्गत भाड्यावरील मर्यादा हटवण्याचा केंद्राचा निर्णय

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान भाड्यांवरील

Indian Navy : भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

भारताच्या सागरी सार्वभौमत्वाच्या क्षेत्रातील निर्णायक क्षण, असे वर्णन करता येईल, अशा शानदार समारंभात, भारतीय