Anup Ghoshal passed away : 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' गाण्यामागील आवाज हरपला

प्रसिद्ध बंगाली गायक अनुप घोषाल यांचे निधन


कोलकाता : प्रसिद्ध बंगाली गायक अनुप घोषाल (Anup Ghoshal) यांचं वयाच्या ७७व्या वर्षी कोलकाता (Kolkata) येथे निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून वृद्धापकाळात आलेल्या आजारपणामुळे त्यांच्यावर दक्षिण कोलकात्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, काल दुपारी १.४० वाजता अनेक अवयव निकामी (Multiple Organ failure) झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.


अनुप यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. असंख्य चाहते आणि सेलिब्रिटी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत. अनुप यांच्या पश्चात दोन मुली आहेत. अनुप यांनी बंगाली, हिंदी, भोजपुरी आणि आसामी भाषांमध्ये अनेक गाणी गायली. सत्यजित रे यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी त्यांनी गायली होती. मात्र १९८३ मध्ये आलेल्या गुलजार दिग्दर्शित 'मासूम' या चित्रपटातील 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' (Tuzse naraz nahin jindagi) या त्यांच्या गाण्याने देशभरातील श्रोत्यांची मनं जिंकली.



वयाच्या चौथ्या वर्षीच संगीताचे धडे


अनुप घोषाल यांनी वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. पहिल्यांदा त्यांनी ऑल इंडिया रेडिओ, कोलकाताच्या मुलांचा कार्यक्रम शिशु महलसाठी गाणं गायलं होतं. काझी नजरुल इस्लाम, रवींद्रनाथ टागोर आणि आधुनिक बंगाली गाण्यांमध्ये अनुप यांनी प्रतिभा सिद्ध केली होती. १९ वर्षांचे असताना आपल्या जादुई आवाजाने त्यांनी सत्यजित रे यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी सत्यजित रे यांच्या ‘गुपी गायने बाघा बायने’ आणि ‘हिरक राजार देशे’ या चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं. दिग्दर्शक तपन सिन्हा यांच्या ‘सगीना महतो’ या चित्रपटातही त्यांनी गाणं गायलं होतं.


अनुप घोषाल यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी बंगाली, हिंदी, (Bollywood Songs) भोजपुरी आणि आसामी भाषांमध्येही अनेक गाणी गायली आहेत. अनुप यांच्या लोकप्रिय हिंदी गाण्यांमध्ये ‘मासूम’ चित्रपटातील ‘तुझसे नराज नहीं जिंदगी’, ‘हुस्न भी आप हैं, इश्क भी आप हैं’ आणि ‘तुम साथ हो जिंदगी भर के लिए’ या गाण्यांचा समावेश आहे.



राजकारणातही होते सक्रिय


त्यांच्या छोट्या राजकीय कारकिर्दीत, अनुप घोषाल यांना ममता बॅनर्जी यांनी २०११ मध्ये तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर उत्तरपारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. ते तिथून जिंकले पण नंतर त्यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही.

Comments
Add Comment

पश्चिम आशियातील युद्धाचा साखर उद्योगाला फटका

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता देशातील साखर उद्योगापर्यंत

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

Gas Cylinder Price Hike :देशभरात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

- घरगुती आणि कमर्शिअल दोन्हीचे दर वाढले मुंबई : देशभरात घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही गॅस सिलेंडरच्या दरात आज,

आंध्र प्रदेशात आता ‘हम दो, हमारे तीन’!

अमरावती (वृत्तसंस्था) : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू असतानाच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.

आखातातील युद्धाने एलएनजी महाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे सध्या आखाती देशांमध्ये तणावपूर्ण

राजस्थानमधील डॉ. अनुज अग्निहोत्री पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी टॉपर!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल शुक्रवारी (६ मार्च) जाहीर