मुंबई: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० संघाचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवबाबत वाईट बातमी समोर आली आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरूवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला चालताही येत नव्हते.
सूर्याला मेडिकल आणि बाकी स्टाफने उचलून मैदानाबाहेर आणले. सूर्या मैदानाबाहेर गेल्यानंतर स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने नेतृत्व केले. सूर्याने या सामन्यात शतकीय खेळी केली होती.
तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात टॉस हरल्यानंतर भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २०१ धावा केल्या होत्या.संघाने २९ धावांवर दोन गडी गमावले होते. शुभमन गिल आणि तिलक वर्मा यांना केशव महाराजने बाद केले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयसवालने ७० बॉलवर ११२ धावांची पार्टनरशिप करत संघाला सांभाळले आणि मोठा स्कोर उभा करून दिला.
यशस्वीने ४१ बॉलवर ६० धावा करत बाद झाला. तर सूर्याने एकीकडे मोर्चा सांभाळला होता. त्याने ५६ चेंडूत शतकी खेळी केली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे हे चौथे शतक होते. सूर्याने आपल्या या खेळीदरम्यान ८ षटकरा आणि ७ चौकार ठोकले.
यानंतर आफ्रिकेचा संघ आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरला. त्यांनी दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिला विकेट गमावला होता. मात्र यानंतर काही वेळातच सूर्यासोबत अपघात घडला. बाऊंड्रीकडे फिल्डिंग करत असताना त्याचा पाय मुरगळला आणि तो जखमी झाला. बाऊंड्रीच्या दिशेने जात असलेला बॉल रोखण्यासाठी सूर्याने वेगाने धावला आणि या दरम्यान तो बॉल घेण्यासाठी वाकला. याच दरम्यान, त्याचा पाय मुरगळला आणि तो जमिनीवर बसला
तातडीने फिजिओ आणि मेडिकलची टीम मैदानावर आली आणि उपचार केले. मात्र सूर्याला आराम नाही मिळाला. त्यानंतर दुखापतीमुळे कण्हत असलेल्या सूर्याला उचलून मैदानाबाहेर आणण्यात आले.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…