मुंबई: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० संघाचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवबाबत वाईट बातमी समोर आली आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरूवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला चालताही येत नव्हते.
सूर्याला मेडिकल आणि बाकी स्टाफने उचलून मैदानाबाहेर आणले. सूर्या मैदानाबाहेर गेल्यानंतर स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने नेतृत्व केले. सूर्याने या सामन्यात शतकीय खेळी केली होती.
तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात टॉस हरल्यानंतर भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २०१ धावा केल्या होत्या.संघाने २९ धावांवर दोन गडी गमावले होते. शुभमन गिल आणि तिलक वर्मा यांना केशव महाराजने बाद केले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयसवालने ७० बॉलवर ११२ धावांची पार्टनरशिप करत संघाला सांभाळले आणि मोठा स्कोर उभा करून दिला.
यशस्वीने ४१ बॉलवर ६० धावा करत बाद झाला. तर सूर्याने एकीकडे मोर्चा सांभाळला होता. त्याने ५६ चेंडूत शतकी खेळी केली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे हे चौथे शतक होते. सूर्याने आपल्या या खेळीदरम्यान ८ षटकरा आणि ७ चौकार ठोकले.
यानंतर आफ्रिकेचा संघ आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरला. त्यांनी दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिला विकेट गमावला होता. मात्र यानंतर काही वेळातच सूर्यासोबत अपघात घडला. बाऊंड्रीकडे फिल्डिंग करत असताना त्याचा पाय मुरगळला आणि तो जखमी झाला. बाऊंड्रीच्या दिशेने जात असलेला बॉल रोखण्यासाठी सूर्याने वेगाने धावला आणि या दरम्यान तो बॉल घेण्यासाठी वाकला. याच दरम्यान, त्याचा पाय मुरगळला आणि तो जमिनीवर बसला
तातडीने फिजिओ आणि मेडिकलची टीम मैदानावर आली आणि उपचार केले. मात्र सूर्याला आराम नाही मिळाला. त्यानंतर दुखापतीमुळे कण्हत असलेल्या सूर्याला उचलून मैदानाबाहेर आणण्यात आले.
नाशिक : नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रामध्ये मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. एकाच मतपेटीत तब्बल ३ मतपत्रिका…
इनोव्हा कार ट्रकला धडकल्याने झाला अपघात यवतमाळ : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ…
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…
पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…
मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…