Suryakumar Yadav: सूर्याला सामन्यादरम्यान झाली दुखापत, उचलून न्यावे लागले मैदानाबाहेर, आयपीएल खेळण्यावर संकट

मुंबई: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० संघाचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवबाबत वाईट बातमी समोर आली आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरूवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला चालताही येत नव्हते.


सूर्याला मेडिकल आणि बाकी स्टाफने उचलून मैदानाबाहेर आणले. सूर्या मैदानाबाहेर गेल्यानंतर स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने नेतृत्व केले. सूर्याने या सामन्यात शतकीय खेळी केली होती.



सूर्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथे शतक


तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात टॉस हरल्यानंतर भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २०१ धावा केल्या होत्या.संघाने २९ धावांवर दोन गडी गमावले होते. शुभमन गिल आणि तिलक वर्मा यांना केशव महाराजने बाद केले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयसवालने ७० बॉलवर ११२ धावांची पार्टनरशिप करत संघाला सांभाळले आणि मोठा स्कोर उभा करून दिला.


यशस्वीने ४१ बॉलवर ६० धावा करत बाद झाला. तर सूर्याने एकीकडे मोर्चा सांभाळला होता. त्याने ५६ चेंडूत शतकी खेळी केली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे हे चौथे शतक होते. सूर्याने आपल्या या खेळीदरम्यान ८ षटकरा आणि ७ चौकार ठोकले.



फिल्डिंगदरम्यान झाला दुखापतग्रस्त


यानंतर आफ्रिकेचा संघ आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरला. त्यांनी दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिला विकेट गमावला होता. मात्र यानंतर काही वेळातच सूर्यासोबत अपघात घडला. बाऊंड्रीकडे फिल्डिंग करत असताना त्याचा पाय मुरगळला आणि तो जखमी झाला. बाऊंड्रीच्या दिशेने जात असलेला बॉल रोखण्यासाठी सूर्याने वेगाने धावला आणि या दरम्यान तो बॉल घेण्यासाठी वाकला. याच दरम्यान, त्याचा पाय मुरगळला आणि तो जमिनीवर बसला


तातडीने फिजिओ आणि मेडिकलची टीम मैदानावर आली आणि उपचार केले. मात्र सूर्याला आराम नाही मिळाला. त्यानंतर दुखापतीमुळे कण्हत असलेल्या सूर्याला उचलून मैदानाबाहेर आणण्यात आले.

Comments
Add Comment

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य

द. आफ्रिकेचा डबल सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय, अफगाणिस्तानची झुंज अपयशी

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी क्रिकेट इतिहासातील सर्वात नाट्यमय आणि चित्तथरारक सामना पाहायला

आयर्लंडची दाणादाण, ऑस्ट्रेलिया ६७ धावांनी विजयी

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये आयर्लंड विरुद्धचा सामना ऑस्ट्रेलियाने ६७ धावांनी जिंकला. या