Aamir Khan new movie : ब्रेकनंतर आमिर खान पुन्हा दिसणार क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत

नव्या चित्रपटाच्या शूटिंगला २०२४ मध्ये होणार सुरुवात


मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) मेहनती अभिनेता आमिर खान (Aamir Khan) गेले अनेक दिवस चित्रपटसृष्टीपासून दूर होता. करीना कपूरसह (Kareena Kapoor) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या सिनेमात तो शेवटचा दिसला होता. आमिर खानचा २०२३ मध्ये एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. या ब्रेकनंतर आता तो २०२४च्या जानेवारी महिन्यातच एका नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्याच्या कमबॅकमुळे चाहते प्रचंड खूश आहेत.


आमिर खानचा आगामी सिनेमा हा २०१८ मध्ये आलेला स्पॅनिश सिनेमा 'चॅम्पियन्स'चा रिमेक असणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन एसआर प्रसन्ना करणार असून जानेवारी महिन्यात शूटिंग सुरू होणार आहे. प्रसन्ना गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत आहे. एका रागीट प्रशिक्षकावर आधारित हा सिनेमा आहे. गतीमंद मंडळींना एकत्र करुन एक टीम बनवणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.


आमिरच्या गाजलेल्या 'दंगल' या चित्रपटात त्याने दोन मुलींच्या वडिलांची भूमिका साकारली होती, जे वडील मुलींनी कुस्तीत यश मिळवण्यासाठी त्यांचे क्रीडा प्रशिक्षक होतात. यानंतर आता आमिर पुन्हा एकदा क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण ही भूमिका 'दंगल'पेक्षा अर्थातच वेगळी असणार आहे.


सध्या या सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनचं काम सुरू आहे. त्यानंतर सिनेमाचे निर्माते २९ जानेवारीपासून शूटिंगला सुरुवात करू शकतात. मुंबईत या सिनेमाच्या शूटचं पहिलं शेड्यूल पार पडणार आहे. या सिनेमाचं कास्टिंग खूप महत्त्वाचं असणार आहे. या सिनेमासाठी योग्य कलाकारांची निवड करण्यासाठी अनेकांची ऑडिशन घेण्यात येणार आहे.


Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च