Aamir Khan new movie : ब्रेकनंतर आमिर खान पुन्हा दिसणार क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत

नव्या चित्रपटाच्या शूटिंगला २०२४ मध्ये होणार सुरुवात


मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) मेहनती अभिनेता आमिर खान (Aamir Khan) गेले अनेक दिवस चित्रपटसृष्टीपासून दूर होता. करीना कपूरसह (Kareena Kapoor) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या सिनेमात तो शेवटचा दिसला होता. आमिर खानचा २०२३ मध्ये एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. या ब्रेकनंतर आता तो २०२४च्या जानेवारी महिन्यातच एका नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्याच्या कमबॅकमुळे चाहते प्रचंड खूश आहेत.


आमिर खानचा आगामी सिनेमा हा २०१८ मध्ये आलेला स्पॅनिश सिनेमा 'चॅम्पियन्स'चा रिमेक असणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन एसआर प्रसन्ना करणार असून जानेवारी महिन्यात शूटिंग सुरू होणार आहे. प्रसन्ना गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत आहे. एका रागीट प्रशिक्षकावर आधारित हा सिनेमा आहे. गतीमंद मंडळींना एकत्र करुन एक टीम बनवणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.


आमिरच्या गाजलेल्या 'दंगल' या चित्रपटात त्याने दोन मुलींच्या वडिलांची भूमिका साकारली होती, जे वडील मुलींनी कुस्तीत यश मिळवण्यासाठी त्यांचे क्रीडा प्रशिक्षक होतात. यानंतर आता आमिर पुन्हा एकदा क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण ही भूमिका 'दंगल'पेक्षा अर्थातच वेगळी असणार आहे.


सध्या या सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनचं काम सुरू आहे. त्यानंतर सिनेमाचे निर्माते २९ जानेवारीपासून शूटिंगला सुरुवात करू शकतात. मुंबईत या सिनेमाच्या शूटचं पहिलं शेड्यूल पार पडणार आहे. या सिनेमाचं कास्टिंग खूप महत्त्वाचं असणार आहे. या सिनेमासाठी योग्य कलाकारांची निवड करण्यासाठी अनेकांची ऑडिशन घेण्यात येणार आहे.


Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने