Aamir Khan new movie : ब्रेकनंतर आमिर खान पुन्हा दिसणार क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत

नव्या चित्रपटाच्या शूटिंगला २०२४ मध्ये होणार सुरुवात


मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) मेहनती अभिनेता आमिर खान (Aamir Khan) गेले अनेक दिवस चित्रपटसृष्टीपासून दूर होता. करीना कपूरसह (Kareena Kapoor) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या सिनेमात तो शेवटचा दिसला होता. आमिर खानचा २०२३ मध्ये एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. या ब्रेकनंतर आता तो २०२४च्या जानेवारी महिन्यातच एका नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्याच्या कमबॅकमुळे चाहते प्रचंड खूश आहेत.


आमिर खानचा आगामी सिनेमा हा २०१८ मध्ये आलेला स्पॅनिश सिनेमा 'चॅम्पियन्स'चा रिमेक असणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन एसआर प्रसन्ना करणार असून जानेवारी महिन्यात शूटिंग सुरू होणार आहे. प्रसन्ना गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत आहे. एका रागीट प्रशिक्षकावर आधारित हा सिनेमा आहे. गतीमंद मंडळींना एकत्र करुन एक टीम बनवणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.


आमिरच्या गाजलेल्या 'दंगल' या चित्रपटात त्याने दोन मुलींच्या वडिलांची भूमिका साकारली होती, जे वडील मुलींनी कुस्तीत यश मिळवण्यासाठी त्यांचे क्रीडा प्रशिक्षक होतात. यानंतर आता आमिर पुन्हा एकदा क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण ही भूमिका 'दंगल'पेक्षा अर्थातच वेगळी असणार आहे.


सध्या या सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनचं काम सुरू आहे. त्यानंतर सिनेमाचे निर्माते २९ जानेवारीपासून शूटिंगला सुरुवात करू शकतात. मुंबईत या सिनेमाच्या शूटचं पहिलं शेड्यूल पार पडणार आहे. या सिनेमाचं कास्टिंग खूप महत्त्वाचं असणार आहे. या सिनेमासाठी योग्य कलाकारांची निवड करण्यासाठी अनेकांची ऑडिशन घेण्यात येणार आहे.


Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी