Traffic Police : मुंबईतल्या ९ मार्गांवर वाहनांना वेग मर्यादा निर्बंध लागू

मुंबई : वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) मुंबईत बुधवारी मध्यरात्रीपासून शहरातील नऊ प्रमुख रस्त्यांवरील नवीन वेग मर्यादा लागू केल्या आहेत.


नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक सुरळीत राखण्याच्या उद्देशाने १३ डिसेंबर २०२३ पासून मुंबई शहरात नमूद मार्गावर वाहने चालविण्यावर वेग मर्यादा निर्बंध घालण्यात आले आहेत.


यामध्ये पी- डीमेलो रोड, शहिद भगतसिंग रोडवर ताशी ५० किलोमीटर (किमी प्रतितास) वेग मर्यादा घोषित केली आहे. तर गोदरेज जंक्शन ते ऑपेरा हाऊस, महर्षी कर्वे रोडवरही ५० किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल.


त्यानंतर हाजीअली जंक्शन ते महालक्ष्मी रेल्वे स्टेशन, केशवराव खाडे मार्ग या ठिकाणीही ५० किमी प्रतितास ही मर्यादा असेल. पुढे बिंदू माधव चौक ते डॉ. केशव बलराम हेडगेवार चौक (लव ग्रोव्ह) जंक्शन, खान अब्दुल गफारखान रोड या ठिकाणी ६० किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल.


डायमंड जंक्शन ते एम. टी. एन. एल. जंक्शन, एव्हॅन्यु - १, बी. के. सी. या ठिकाणी ६० किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) वर ७० किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल. यासह जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) उड्डाणपुलावर चढण, उतरण व वळणावर वेग मर्यादा ३० कि.मी. प्रती तास आणि उड्डाणपुलावरील पूर्व/पश्चिम वाहिनीवर वेगमर्यादा ७० कि.मी. प्रती तास राहील.


वीर जिजामाता भोसले उड्डाणपुल, चेंबुर या ठिकाणी ६० किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल. चढ व उतार ४० कि.मी. प्रति तास. या सोबत छेडा नगर येथील नवीन उड्डाणपुल (दक्षिणोत्तर) येथे ४० किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल. चढ व उतार ४० कि.मी. प्रति तास असेल. अमर महल फ्लायओव्हरवर येथील वेग मर्यादा ७० किमी प्रतितास असेल. चढ व उतारावर ४० किमी प्रतितास मर्यादा असेल.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील