Traffic Police : मुंबईतल्या ९ मार्गांवर वाहनांना वेग मर्यादा निर्बंध लागू

मुंबई : वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) मुंबईत बुधवारी मध्यरात्रीपासून शहरातील नऊ प्रमुख रस्त्यांवरील नवीन वेग मर्यादा लागू केल्या आहेत.


नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक सुरळीत राखण्याच्या उद्देशाने १३ डिसेंबर २०२३ पासून मुंबई शहरात नमूद मार्गावर वाहने चालविण्यावर वेग मर्यादा निर्बंध घालण्यात आले आहेत.


यामध्ये पी- डीमेलो रोड, शहिद भगतसिंग रोडवर ताशी ५० किलोमीटर (किमी प्रतितास) वेग मर्यादा घोषित केली आहे. तर गोदरेज जंक्शन ते ऑपेरा हाऊस, महर्षी कर्वे रोडवरही ५० किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल.


त्यानंतर हाजीअली जंक्शन ते महालक्ष्मी रेल्वे स्टेशन, केशवराव खाडे मार्ग या ठिकाणीही ५० किमी प्रतितास ही मर्यादा असेल. पुढे बिंदू माधव चौक ते डॉ. केशव बलराम हेडगेवार चौक (लव ग्रोव्ह) जंक्शन, खान अब्दुल गफारखान रोड या ठिकाणी ६० किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल.


डायमंड जंक्शन ते एम. टी. एन. एल. जंक्शन, एव्हॅन्यु - १, बी. के. सी. या ठिकाणी ६० किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) वर ७० किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल. यासह जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) उड्डाणपुलावर चढण, उतरण व वळणावर वेग मर्यादा ३० कि.मी. प्रती तास आणि उड्डाणपुलावरील पूर्व/पश्चिम वाहिनीवर वेगमर्यादा ७० कि.मी. प्रती तास राहील.


वीर जिजामाता भोसले उड्डाणपुल, चेंबुर या ठिकाणी ६० किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल. चढ व उतार ४० कि.मी. प्रति तास. या सोबत छेडा नगर येथील नवीन उड्डाणपुल (दक्षिणोत्तर) येथे ४० किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल. चढ व उतार ४० कि.मी. प्रति तास असेल. अमर महल फ्लायओव्हरवर येथील वेग मर्यादा ७० किमी प्रतितास असेल. चढ व उतारावर ४० किमी प्रतितास मर्यादा असेल.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने ४ जणांना चिरडले!

मस्जीद बंदर रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना, रेल्वे कर्मचा-यांच्या आंदोलनाने घेतले बळी, दोष कुणाचा? मुंबई :

बीडीडीतील ८४६ रहिवाशांना आठवड्याभरात मिळणार घरे

पहिल्या टप्प्यातील पाच इमारती तयार मुंबई : बीडीडी चाळीतील रहिवाशांना गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर वरळीतील

जे निर्माण करू शकत नाहीत, तेच तोडफोडीवर बोलणार; नमो केंद्रावरून राजकीय वादंग!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवं वादळ उठलंय. प्रश्न हा आहे की, फक्त तोडण्याची भाषा करणाऱ्यांना

‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण; मंत्रालयात निनादणार समूहगान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'सार्ध शताब्दी' महोत्सवास उद्या सुरुवात मुंबई : देशप्रेमाचे

न्यायालये केवळ इमारती नसून लोकशाही मूल्यांचे प्रतीक – सरन्यायाधीश भूषण गवई

वांद्रे पूर्व येथे उच्च न्यायालय संकुलाची पायाभरणी व कोनशीलेचे अनावरण मुंबई : न्यायालयीन इमारती या केवळ भव्य

सीएसएमटीवर मोटरमन, कर्मचाऱ्यांचे अचानक आंदोलन; मुंबईकरांचे हाल! ऐन गर्दीच्या वेळेत लोकल सेवा ठप्प

४ महिन्यांपूर्वीच्या अपघातावरून अभियंत्यांवर गुन्हा; रेल्वे कर्मचाऱ्यांनी काम थांबवत व्यक्त केला संताप मुंबई