Weather Updates : उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट; पण मुंबईत कधी?

जाणून घ्या काय आहे देशभरातील हवामानाची स्थिती...


मुंबई : अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) संपूर्ण वातावरणच सध्या बदललल्याचं चित्र आहे. त्यात हिवाळ्याचा मोसम (Winter Season) सुरु झाल्याने मुंबईकरांना थंडी अनुभवायला मिळेल अशी आशा होती. मात्र, अजूनही मुंबईत जागोजागी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळाव्यात इतकी थंडी पडलेली नाही. दक्षिण पूर्व अरबी समुद्रापासून उत्तर कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा मुंबईच्या वातावरणासही (Mumbai Weather) कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे मुंबईकरांना अजूनही थंडीची प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर उत्तर भारतात (North India) मात्र तीव्र थंडीची लाट आली असून अनेक पर्यटक या थंडीचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत.


उत्तर कोकण आणि गोवा किनारपट्टी भागातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई आणि परिसरात आग्नेय दिशेकडून वारे वाहतील. हे वारे उबदार असतील आणि त्यामुळे तापमानात जास्त घट होणार नाही. १८ ते २० डिसेंबर दरम्यान, वाऱ्याची दिशा थोडी बदलण्याची शक्यता आहे. पण, शक्यतो महाराष्ट्राच्या हवामानात जास्त बदल होणार नसून तापमान कायम राहील, असा अंदाज आहे.


दुसरीकडे उत्तर भारतात मात्र तीव्र थंडीची लाट पाहायला मिळत आहे. काही भागात तापमान शून्याच्या खाली घसरलं आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असल्यामुळे नयनरम्य दृश्ये पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पर्यटक सर्वत्र परसलेली बर्फाची चादर आणि गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत. काश्मीर खोऱ्यात सध्या हाडं गोठवणारी थंडी आहे.



देशभरात काही ठिकाणी पावसाची शक्यता


आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार, देशभरात काही ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तामिळनाडू, केरळ, किनारी कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश, पूर्व आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, सिक्कीममध्ये आज गारपीट होण्याची शक्यता आहे. पण, महाराष्ट्रात मात्र आज कोरडं आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात या आठवड्यात तापमानात जास्त बदल होण्याची शक्यता नाही.

Comments
Add Comment

ऑक्टोबरमध्ये फिरायला जायचंय तर राजस्थान आहे एकदम बेस्ट

मुंबई : वाळवंटाची सुवर्ण वाळू, राजवाड्यांचे भव्य ऐश्वर्य, लोककलेचा रंग, आणि संस्कृतीचा सुगंध म्हणजे आपलं

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय