Weather Updates : उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट; पण मुंबईत कधी?

जाणून घ्या काय आहे देशभरातील हवामानाची स्थिती...


मुंबई : अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) संपूर्ण वातावरणच सध्या बदललल्याचं चित्र आहे. त्यात हिवाळ्याचा मोसम (Winter Season) सुरु झाल्याने मुंबईकरांना थंडी अनुभवायला मिळेल अशी आशा होती. मात्र, अजूनही मुंबईत जागोजागी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळाव्यात इतकी थंडी पडलेली नाही. दक्षिण पूर्व अरबी समुद्रापासून उत्तर कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा मुंबईच्या वातावरणासही (Mumbai Weather) कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे मुंबईकरांना अजूनही थंडीची प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर उत्तर भारतात (North India) मात्र तीव्र थंडीची लाट आली असून अनेक पर्यटक या थंडीचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत.


उत्तर कोकण आणि गोवा किनारपट्टी भागातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई आणि परिसरात आग्नेय दिशेकडून वारे वाहतील. हे वारे उबदार असतील आणि त्यामुळे तापमानात जास्त घट होणार नाही. १८ ते २० डिसेंबर दरम्यान, वाऱ्याची दिशा थोडी बदलण्याची शक्यता आहे. पण, शक्यतो महाराष्ट्राच्या हवामानात जास्त बदल होणार नसून तापमान कायम राहील, असा अंदाज आहे.


दुसरीकडे उत्तर भारतात मात्र तीव्र थंडीची लाट पाहायला मिळत आहे. काही भागात तापमान शून्याच्या खाली घसरलं आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असल्यामुळे नयनरम्य दृश्ये पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पर्यटक सर्वत्र परसलेली बर्फाची चादर आणि गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत. काश्मीर खोऱ्यात सध्या हाडं गोठवणारी थंडी आहे.



देशभरात काही ठिकाणी पावसाची शक्यता


आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार, देशभरात काही ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तामिळनाडू, केरळ, किनारी कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश, पूर्व आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, सिक्कीममध्ये आज गारपीट होण्याची शक्यता आहे. पण, महाराष्ट्रात मात्र आज कोरडं आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात या आठवड्यात तापमानात जास्त बदल होण्याची शक्यता नाही.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला