अमली पदार्थांचे अड्डे विधानसभेत गाजले!

नाशिकच्या अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर त्वरित कारवाई करण्याची आमदार नितेश राणे यांची मागणी


नागपूर : महाराष्ट्रातील काही ठिकाणे अमली पदार्थांचे अड्डे बनत चालते असून नाशिक येथील भद्रकाली या ठिकाणी तर खुलेआम त्याची विक्री केली जात असल्याचे आज भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत निदर्शनास आणून दिले व त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.



ते म्हणाले की, नाशिक येथील भद्रावती येथे एमडी व इतर अमली पदार्थांची सर्रास विक्री होत आहे. दुकानाचे अर्धे शटर उघडे ठेऊन रात्री उशिरापर्यंत अमली पदार्थ मिळतात. आपण याची तक्रार तेथील पी आय पाटील यांच्याकडे केली असता कालपर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली नाही. महाराष्ट्र हा आता अशा अवैध धंद्यांचा अड्डा बनू पाहत असून काही अल्पसंख्यांक समाजातील लोक यांच्यात अग्रेसर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच याबाबत गृहखात्याने लक्ष घालून यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी विधानसभेत केली.






Comments
Add Comment

baba adhav passed away : कष्टकऱ्यांचा आधार हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचे निधन; वयाच्या ९५ व्या वर्षी बाबा आढावांनी घेतला अखेरचा श्वास

पुणे : राज्यातील पुरोगामी चळवळीला आणि शेतकरी-कामगार वर्गाला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा

जास्तीचे शुल्क न आकारता प्रवाशांचे पैसे परत करा, मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश

पुणे : 'इंडिगो' च्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसलेल्या प्रवाशांकडून जास्तीचे शुल्क न आकारता प्रवाशांचे पैसे परत करा

राज्यातील ४९ लाख जमिनी अधिकृत होणार

नागपूर : महाराष्ट्र सरकारने शेतजमिनीच्या तुकडेबंदी कायद्यात ऐतिहासिक सुधारणा करत मुंबई, पुणे, नागपूरसह

'या' तारखेला १०३ वर्षांचा ब्रिटिशकालीन पूल पाडणार, कसं असेल मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक?

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील जवळपास १०३ वर्षे जुना असलेला ब्रिटिशकालीन रोड ओव्हर ब्रिज अखेर

विधानपरिषद आणि विधानसभेचे तालिका अध्यक्ष जाहीर; ७५ हजार २८६ कोटी ३८ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

नागपूर : विधानपरिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात जाहीर

वन विभागाचा मोठा निर्णय; बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास कुटुंबातील एका नातलगाला मिळेल सरकारी नोकरी

मुंबई : महाराष्ट्रात मागील कही दिवसांपासून बिबट्याने उच्छाद मांडला आहे. वाघांचे, बिबट्यांचे नागरिकांवर हल्ला