Madhya pradesh CM: मोहन यादव बनले मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

भोपाळ: मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण याबाबतचा सस्पेन्स सोमवारी ११ नोव्हेंबरला अखेर संपला. उज्जैन दक्षिण येथील भाजप आमदार मोहन यादव यांच्या गळ्यात अखेर मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. दीर्घकाळ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या शिवराज सिंह चौहान यांच्या जागी मध्य प्रदेशची कमान भाजपने मोहन यादव यांच्याकडे सोपवली. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल या गोष्टी



लोकांनी टाकला विश्वास


मोहन यादव मध्य प्रदेशच्या उज्जैन दक्षिण येथून सलग तीन वेळा निवडणूक जिंकले आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उज्जैन दक्षिण येथून काँग्रेसचे उमेदवार चेतन प्रेमनारायण यादव यांना १२ हजार ९४१ मतांनी हरवले होते. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार मोहन यादव यांना ९५ हजार ६९९ मते मिळाली होती.



ओबीसी समाजातील नेते


मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री निवडीमागचे कारण म्हणजे ओबीसी समाजातील ेते. तेथे ओबीसीची लोकसंख्या ४८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. भाजप २००३ नंतर मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी ओबीसी नेत्यांसोबत गेली आहे.



आरएसएसच्या जवळ


मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे आहेत. त्यांनी १९९३ ते १९९५ पर्यंत आरएसएससाठी काम केले आहे. यादव माधव विज्ञान महाविद्यालय छात्रसंघाचे सह सचिव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उज्जैनचे नगर मंत्री राहिले आहेत.



कोणत्याही वादात नाव नाही


मोहन यादव यांचे कोणत्याही वादात नाव आलेले नाही. याशिवाय ते मध्य प्रदेश सरकारमध्ये २०२० ते २०२३ दरम्यान शिक्षण मंत्री राहिले आहेत. त्यांच्या शिक्षणाबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी एमबीए आणि पीएचडी केली आहे.


मोहन यादव यांनी १९९७मध्ये भाजपमध्ये येत राजकारणाला सुरूवात केली होती. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. भाजपने या राज्यात २३० जागांपैकी १६३ जागांवर विजय मिळवला आहे.

Comments
Add Comment

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर

दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या