Madhya pradesh CM: मोहन यादव बनले मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

भोपाळ: मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण याबाबतचा सस्पेन्स सोमवारी ११ नोव्हेंबरला अखेर संपला. उज्जैन दक्षिण येथील भाजप आमदार मोहन यादव यांच्या गळ्यात अखेर मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. दीर्घकाळ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या शिवराज सिंह चौहान यांच्या जागी मध्य प्रदेशची कमान भाजपने मोहन यादव यांच्याकडे सोपवली. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल या गोष्टी



लोकांनी टाकला विश्वास


मोहन यादव मध्य प्रदेशच्या उज्जैन दक्षिण येथून सलग तीन वेळा निवडणूक जिंकले आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उज्जैन दक्षिण येथून काँग्रेसचे उमेदवार चेतन प्रेमनारायण यादव यांना १२ हजार ९४१ मतांनी हरवले होते. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार मोहन यादव यांना ९५ हजार ६९९ मते मिळाली होती.



ओबीसी समाजातील नेते


मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री निवडीमागचे कारण म्हणजे ओबीसी समाजातील ेते. तेथे ओबीसीची लोकसंख्या ४८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. भाजप २००३ नंतर मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी ओबीसी नेत्यांसोबत गेली आहे.



आरएसएसच्या जवळ


मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे आहेत. त्यांनी १९९३ ते १९९५ पर्यंत आरएसएससाठी काम केले आहे. यादव माधव विज्ञान महाविद्यालय छात्रसंघाचे सह सचिव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उज्जैनचे नगर मंत्री राहिले आहेत.



कोणत्याही वादात नाव नाही


मोहन यादव यांचे कोणत्याही वादात नाव आलेले नाही. याशिवाय ते मध्य प्रदेश सरकारमध्ये २०२० ते २०२३ दरम्यान शिक्षण मंत्री राहिले आहेत. त्यांच्या शिक्षणाबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी एमबीए आणि पीएचडी केली आहे.


मोहन यादव यांनी १९९७मध्ये भाजपमध्ये येत राजकारणाला सुरूवात केली होती. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. भाजपने या राज्यात २३० जागांपैकी १६३ जागांवर विजय मिळवला आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे