भोपाळ: मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण याबाबतचा सस्पेन्स सोमवारी ११ नोव्हेंबरला अखेर संपला. उज्जैन दक्षिण येथील भाजप आमदार मोहन यादव यांच्या गळ्यात अखेर मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. दीर्घकाळ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या शिवराज सिंह चौहान यांच्या जागी मध्य प्रदेशची कमान भाजपने मोहन यादव यांच्याकडे सोपवली. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल या गोष्टी
मोहन यादव मध्य प्रदेशच्या उज्जैन दक्षिण येथून सलग तीन वेळा निवडणूक जिंकले आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उज्जैन दक्षिण येथून काँग्रेसचे उमेदवार चेतन प्रेमनारायण यादव यांना १२ हजार ९४१ मतांनी हरवले होते. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार मोहन यादव यांना ९५ हजार ६९९ मते मिळाली होती.
मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री निवडीमागचे कारण म्हणजे ओबीसी समाजातील ेते. तेथे ओबीसीची लोकसंख्या ४८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. भाजप २००३ नंतर मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी ओबीसी नेत्यांसोबत गेली आहे.
मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे आहेत. त्यांनी १९९३ ते १९९५ पर्यंत आरएसएससाठी काम केले आहे. यादव माधव विज्ञान महाविद्यालय छात्रसंघाचे सह सचिव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उज्जैनचे नगर मंत्री राहिले आहेत.
मोहन यादव यांचे कोणत्याही वादात नाव आलेले नाही. याशिवाय ते मध्य प्रदेश सरकारमध्ये २०२० ते २०२३ दरम्यान शिक्षण मंत्री राहिले आहेत. त्यांच्या शिक्षणाबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी एमबीए आणि पीएचडी केली आहे.
मोहन यादव यांनी १९९७मध्ये भाजपमध्ये येत राजकारणाला सुरूवात केली होती. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. भाजपने या राज्यात २३० जागांपैकी १६३ जागांवर विजय मिळवला आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…