IND vs ENG: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा

नवी दिल्ली: इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने(england and wells cricket board) भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी(test series) आपल्या संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडने २५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेसाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात स्टार ऑलराऊंडर सॅम कर्रन आणि विकेटकीपर फलंदाज जोस बटलर यांना स्थान देण्यात आलेले नाही. दरम्यान, तीन नव्या चेहऱ्यांना संघात स्थान देण्यात आले आहे.


इंग्लंडने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तीन नवे चेहरे समाविष्ट केले आहेत. यात शोएब बशीर, टॉम हार्टले आणि गस एटकिंसन यांचा समावेश आहे. तर ओली पोप या संघाचा उप कर्णधार आहे. इंग्लंडने टॉम हार्टले, जॅक लीच आणि रेहान अहमदच्या रूपात तीन स्पिनर्सना संघात जागा दिली आहे.


भारतात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघात ज्यो रूट, जॉनी बेअरस्ट्रॉ, हॅरी ब्रुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन स्टोक्स, शोएब बशीर, बेन फॉक्स आणि ओली पोप यांच्या रूपात नऊ फलंदाज आहेत.


जानेवारीत बेन स्टोक्सचा संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २५ जानेवारीपासून हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर २ फेब्रुवारीपासून दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे, १५ फेब्रुवारीपासून तिसरी कसोटी राजकोटमध्ये, २३ फेब्रुवारीपासून चौथी कसोटी रांचीमध्ये आणि सात मार्चपासून शेवटची कसोटी धर्मशालामध्ये खेळवली जाणार आहे.


भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स(कर्णधार), रेहान अहदमद, जेम्स अँडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेअरस्ट्रॉ(विकेटकीपर), शोएब बशीर, हॅरी ब्रुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स, टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, ज्यो रूट आणि मार्क वूड.



भारत-इंग्लंड पाच सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक


पहिली कसोटी - भारत वि इंग्लंड, २५-२९ जानेवारी, हैदराबाद
दुसरी कसोटी - भारत वि इंग्लंड, २-६ फेब्रुवारी, विशाखापट्टणम
तिसरी कसोटी - भारत वि इंग्लंड, १५-१९ फेब्रुवारी, राजकोट
चौथी कसोटी - भारत वि इंग्लंड, २३-२७ फेब्रुवारी, रांची
पाचवी कसोटी- भारत वि इंग्लंड, ७-११ मार्च, धर्मशाला

Comments
Add Comment

भारत १९ वर्षांखालील आशिया कप फायनलमध्ये विक्रमी नवव्यांदा विजय मिळवण्याकडे भारताचे लक्ष्य...

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा अंतिम सामना आज, २१ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयुष

भारत-श्रीलंका महिला संघांमध्ये टी-२० चा रणसंग्राम

आजपासून मालिकेला सुरुवात विश्वचषक संघ निवडीसाठी खेळाडूंची कसोटी विशाखापट्टनम : २०२६ च्या महिला टी-२०

दुबईत रविवारी भारत-पाक आमने-सामने, आशिया चषकावर कोण नाव कोरणार ?

दुबई  : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि पारंपरिक लढत पुन्हा एकदा अंतिम सामन्याच्या निमित्ताने रंगणार आहे.

टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; गिलला वगळले

मुंबई : भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजीत करत असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक २०२६ साठी बीसीसीआयच्या निवड

India T20 World Cup Squad Announcement : वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया सज्ज! BCCIची आज महत्त्वाची बैठक; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट?

मुंबई : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी संपूर्ण क्रिकेट विश्व ज्याची वाट पाहत आहे, त्या भारतीय संघाची घोषणा

भारताचा मालिका विजय

हार्दिक-तिलकच्या वादळानंतर गोलंदाजांचा कहर; विश्वचषकाच्या तयारीला बळ अहमदाबाद  : नरेंद्र मोदी स्टेडियमवर