Box Office Collection: रणबीरच्या Animalने १० व्या दिवशी रचला इतिहास

मुंबई: रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांचा अॅनिमल सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गरजत आहे. या सिनेमाची १० दिवसानंतरही क्रेझ पाहायला मिळत आहे. सिनेमागृहे प्रेक्षकांनी खचाखच भरलेली दिसत आहेत. अशातच हा सिनेमा दररोज नवनवे रेकॉर्ड तोडत आहे. सोबतच बॉक्स ऑफिस कलेक्शनही जबरदस्त करत आहे.

रिलीजच्या १०व्या दिवशी केली इतकी कमाई


अॅक्शन, क्राईम, इंटिमेशन आणि रोमान्स यांनी फुल एंटरटेनमेंट असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच रिलीजच्या १० दिवसानंतरही याची क्रेझ काही कमी झालेली नाही. या सिनेमाने पहिल्या आठवड्यात ३३७.५८ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यातही दमदार कामगिरी केली.

या सिनेमाने दुसऱ्या शुक्रवारी २२.९५ कोटी रूपये कमावले तर दुसऱ्या शनिवारी या सिनेमाने ५१.३७ कोटींची कमाई केली. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंडनुसार या सिनेमाने रिलीजच्या १०व्या दवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी ३७ कोटी कमावले. यासोबतच रिलीजच्या १० दिवसांची कमाई आता ४२७ कोटी इतकी झाली आहे.

१०व्या दिवशी दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा


अॅनिमल हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर १०व्या दिवशी ३७ कोटींची कमाई केली. यासोबतच हा सिनेमा १०व्या दिवशी सर्वाधिक कमावणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने १०व्या दिवसाच्या कमाईत सर्वांना मागे टाकले.

अॅनिमल हा सिनेमा संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमात रणबीर कपूरशिवाय रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी यांनी महत्त्वाची भूमिका केली आहे.
Comments
Add Comment

आता लोकल गाड्या दादर, ठाण्यापर्यंतच धावणार; ३ महिने राहणार हे' प्लॅटफॉर्म बंद

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. दररोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता एका मोठ्या जम्बो ब्लॉक चा

भारतातील मलेरिया रुग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबई : मलेरिया हा आजार एकेकाळी भारतातील सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठे आव्हान मानला जात होता. मात्र गेल्या दशकात

Rohit Shetty : बॉलिवूड हादरलं! ॲक्शन किंग अन् दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या जुहूतील बंगल्यावर मध्यरात्री गोळीबार; तो आला अन्...थेट

मुंबई : बॉलीवूडचे 'ॲक्शन किंग' म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर

वाढत्या वायुप्रदूषणाचा डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

१८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांमध्ये या तक्रारींचे प्रमाण अधिक मुंबई : मुंबईतील वाढते वायुप्रदूषण आता केवळ

धारावी ते घाटकोपरमधील प्रक्रिया केलेले मलजल भांडुप संकुलात

पाणी वहन करण्यासाठी संकुलात ९७० लिटर क्षमतेचा जलबोगद्याची उभारणी मलजल प्रक्रिया केंद्रातील पाणी वहन करणाऱ्या

मुंबईकरांनो, राणीबागे भरणार पुष्पोत्सव, कोणत्या तारखेला ते जाणून घ्या..

मुंबई : शिशिर ऋतूची चाहूल लागली की मुंबईकरांना वेध लागतात ते ‘मुंबई पुष्पोत्सवाचे’. घड्याळाच्या काट्यावर आणि