Tripti Dimri Animal : तू असं करायला नको होतं...

तृप्तीच्या 'अ‍ॅनिमल' मधील इंटिमेट सीन्सवर पालकांसह तृप्तीचीही प्रतिक्रिया आली समोर


मुंबई : सध्या बॉक्स ऑफिसवर (Box office) 'अ‍ॅनिमल' (Animal) हा चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालत आहे. यात जे कलाकार ट्रेलरमध्ये फारसे दिसलेही नव्हते त्यांचीच चर्चा होत असल्याचं दिसत आहे. मराठी कलाकार उपेंद्र लिमये (Upendra Limaye) याच्या 'अ‍ॅनिमल'मधील कामाचं भरभरुन कौतुक होत आहे. तर अभिनेत्री तृप्ती डिमरीचीही (Tripti Dimri) प्रचंड चर्चा होत आहे. तिचं काम चाहत्यांना भलतंच आवडलं आहे.


'अ‍ॅनिमल' चित्रपटात तृप्तीने रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) अनेक इंटिमेट सीन्स (Intimate scenes) दिले आहेत. या सीन्सचीही सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड चर्चा आहे. यापूर्वी तृप्तीने ते सीन कसे शूट झाले होते आणि दिग्दर्शक संदिप रेड्डी (Sandeep Reddy) आणि रणबीरने ती परिस्थिती कशी हाताळली हे सांगितले होते. आता तिच्या या इंटिमेट सीनवर तिच्या पालकांची कशी प्रतिक्रिया होती हे तिने सांगितले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या मुलीला अशा भूमिकेत पाहून तिच्या आईवडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.


रणबीर कपूरसोबतचे ते इंटिमेट सीन पाहून पालकांना धक्का बसल्याचे तृप्तीने सांगितले. ते म्हणाले, 'आम्ही चित्रपटांमध्ये असं काही यापूर्वी पाहिलं नाही आणि तू ते केलं.' त्या सीन्समधून सावरायला त्यांना थोडा वेळ लागला. ते पुढे म्हणाले, 'तू हे करायला नको होतं, पण ठीक आहे. पालक या नात्याने आम्हाला असं वाटणं सहाजिक आहे, असा खुलासा तृप्तीने केला.


पुढे ती म्हणाली, 'मी त्यांना सांगितले की मी काहीही चुकीचे केले नाही. हे माझे काम आहे आणि जोपर्यंत मी सुरक्षित आहे तोपर्यंत मला ते करण्यात काहीही अडचण वाटत नाही. मी एक अभिनेत्री आहे आणि मी साकारलेल्या व्यक्तिरेखेशी मी १०० टक्के प्रामाणिक असलं पाहिजे आणि मी ते केले.'


तृप्ती डिमरीने 'लैला मजनू' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 'बुलबुल' आणि 'कला'मध्येही तिने काम केले आहे. मात्र तृप्ती डिमरीसाठी 'अ‍ॅनिमल' चित्रपट टर्निंग पॉइंट ठरला. आता ती अनिल रविपुडी यांच्या आगामी 'मास महाराजा' या चित्रपटातून साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

Comments
Add Comment

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील