Nitesh Rane : आदित्य ठाकरेंना अटक करून तपास करावा

आमदार नितेश राणे यांची मागणी


मुंबई : दिशा सालियन यांनी आत्महत्या केल्याचे कुणी बोलत आहे, तर कुणी अपघात म्हणत आहे, पण आम्ही ही हत्या असल्याचे म्हणत आहोत. याप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाची जेव्हा चौकशी सुरू होईल तेव्हा आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) अटक करून चौकशी केल्यास सत्य समोर येईल, असा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विश्वास व्यक्त केला आहे.


खासदार संजय राऊत यांच्या विधानानंतर आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाच्या नैतिकतेविषयी संजय राऊत सारख्या खिचडी चोराचा आरोप असलेल्यांच्या सल्ल्याची गरज नाही, असा हल्लाबोल राणे यांनी केला.


भाजपाकडे नैतिकता औषधालाही शिल्लक राहिली नसून त्यांच्या नैतिकतेचे ऑडिट करण्याची गरज असल्याचे विधान राऊत यांनी केले होते. त्यांच्या या टीकेला राणे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.


आ. नितेश राणे म्हणाले की, नैतिकतेचे ऑडिट कुणी करावे याचे नियम असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल राऊत वाटेल ते बोलत आहेत. जनतेने भाजपाला मतदानाच्या रुपात आशीर्वाद दिला आहे, त्यामुळे भाजपा खासदारांची संख्या २ खासदारांवरून ३०० वर पोहचली आहे. तर ठाकरे गटाची संख्या ५६ आमदारांवरून १५ वर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरचे महापौर ते आजपर्यंतच्या प्रवासाविषयी जनतेने ऑडिट केले आहे, त्यामुळे आम्हाला खिचडी चोरांच्या सल्ल्याची गरज नाही.


त्याचप्रमाणे हिंदुत्वाचे ऑडिट राऊत करू शकत नाहीत. कधीतरी तुमच्या कुटुंबात तुमचे काय स्थान आहे? याचेही ऑडिट करा, असेही राणे म्हणाले. ज्या कुटुंबाचे पोट कोविड खिचडी घोटाळ्यावर भरते, त्याचे ऑडिट करावे. हॉटेल हयातचे बिल कोण भरते? याबद्दलही राणे यांनी ठाकरेंवर ताशेरे ओढले. बातम्यांमध्ये राहण्यासाठी संजय राऊत काहीही बोलत असतात. २०१० ला निलेश चव्हाणने आत्महत्या केली असे दाखविण्यात आले. या प्रकरणाचीही चौकशी झाली पाहिजे. कुणाच्या दबाबाखाली ही आत्महत्या केली. याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी यावेळी राणे यांनी केली. आदित्य ठाकरे यांच्यावर एका महिलेवर गँगरेप तसेच मर्डर केल्याचा आरोप आहे. इकडे तुम्ही ऑडिटची भाषा बोलता, असा सवालही त्यांनी केला.


राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकत्र बसवून उबाठाची सगळी लफडी बाहेर काढीन, असा इशाराही आमदार राणे यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीची सफाई केली असून, त्यांनी अजून सफाई केली, तर काहीच शिल्लक राहणार नाही, असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त