५० मेगापिक्सेल कॅमेरा आणि ५०००mAhबॅटरीसह Realmeचा आहे स्वस्त स्मार्टफोन

नवी दिल्ली: Realme भारतात आपला नवा स्मार्टफोन लाँच करत आहे. हा हँडसेट १४ डिसेंबरला लाँच होणार आहे आणि या हँडसेटचे नाव Realme C67 5G असेल. हा एक परवडणारा स्मार्टफोन असेल. हा फोन १५ हजार रूपयांपेक्षा कमी किंमतीला मिळू शकतो. कंपनीने एक्स सोशल मीडियाच्या अधिकृत अकाऊंटवर याबाबतीत पोस्ट केली आहे तसेच लाँचिंग डेटही कन्फर्म केली आहे.


रिअलमीच्या अधिकृत वेबसाईटवर एक टीझर पोस्टर समोर आला आहे यात लाँचिंग डेटसह फोनला दाखवण्यात आले आहे. या फोनचे नाव Realme C67 5G असेल. हा फोन c सीरिजचा भाग आहे. हा एक परवडणारा हँडसेट असेल. कंपनीने या सीरिजमध्ये आधी अनेक हँडसेट लाँच केले आहेत. अधिकृत टीझरवरून समजते की रिअलमीचा अपकमिंग फोन फ्लॅट स्क्रीनसोबत येईल.



Realme c सीरिजमध्ये अनेक परवडणारे स्मार्टफोन


Realme c सीरिजअंतर्गत कंपनीने अनेक किफायतशीर स्मार्टफोन लाँच केले आहेत. या वर्षी कंपनीने Realme cs3 भारतात लाँच केला होता. यात अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. ८९९९ रूपयांपासूनच्या सुरूवाती किंमतीचा हा फोन १०८ एमपी कॅमेऱ्यासह येतो. कंपनीचा दावा आहे की हा १०८ एमपी कॅमेरा असलेला भारताचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.


 


Realme C67 5Gचे फीचर्स


Realme C67 5G बद्दल अनेक लीक्स समोर आले आहे. यात फोनमध्ये विविध फीचर्स असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात ५०एमपी प्रायमरी कॅमेरा असू शकतो. तसेच यात ५०००mAh बॅटरी असू शकते. या हँडसेटची किंमत १२-१५ हजार रूपयांदरम्यान असू शकते.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात