Nitin Gadkari: संसदेत असे काय घडले ज्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना म्हणावे लागले 'सॉरी'

नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यात विविध मुद्द्यावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी होत आहेत. यातच गुरूवारी सदनात एक असा प्रश्न उपस्थित झाला त्याचे उत्तर देताना रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी(nitin gadkari) यांना म्हणावे लागले की 'सॉरी हे आमच्या विभागाचे अपयश आहे'.


एक्सप्रेसवेवरील सातत्याने होणाऱ्या रस्ते अपघाताबाबतच्या एका प्रश्नावरून त्यांनी हे उत्तर दिले. सोबतच ते म्हणाले की लोकांनी रस्त्यावर चालताना सुरक्षेसंबंधी ट्र्रॅफिकचे नियम पाळावेत तेव्हाच अशा घटनांचे प्रमाण कमी होईल.



आम्ही अशा घटना रोखू शकलो नाही हे चिंताजक


लोकसभेत वायएसआर काँग्रेस पक्षाचे कोटगिरी श्रीधर यांच्या प्रश्नावर उत्तर देताना गडकरी म्हणाले, दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे देशातील रस्ते अपघाताच्या घटना कमी होत नाही आहेत. गडकरी यांनी देशातील रस्ते अपघात आणि त्यातील लोकांच्या मृत्यूबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले त्यांच्या विभागाच्या सातत्याच्या प्रयत्नानंतरही रस्ते अपघात काही कमी होत नाही आहेत.



वेगाच्या मर्यादेत सूट देण्याची लोकांची मागणी


एक्सप्रेसवेवर एकीकडे काही लोक वेगाच्या मर्यादी वाढवण्याची मागणी करतात तर या संबंधातील कायद्यात सूट देण्याची मागणी करतात. तर काही लोक वेगमर्यादा कमी करण्यासाठी प्रस्ताव देतात. एक्सप्रेसवेवर गाड्यांचा वेग कमीत कमी १०० किमी प्रति तासापेक्षा अधिक असतो. काहीजण १४० ते १६०च्या स्पीडने गाडी चालवतात.



सातत्याने होत आहेत रस्ते अपघात


दरवर्षी रस्ते अपघातात सातत्याने वाढ होत आहे. यावर नितीन गडकरी म्हणाले, २०२१मध्ये देशात ४ लाख १२ हजार ४३२ रस्ते अपघात झाले तर त्याच्या पुढील वर्षी ४ लाख ६१ हजार ३१२ अपघात झाले. यात १२ टक्के वाढ झाली. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे प्रमाण २०२१मध्ये एक लाख ५३ हजार ९७२ होते ते वाढून २०२२मध्ये एक लाख ६८ हजार ४९१ झाले. यात १० टक्के वाढ झाली.



रस्ते अपघात कमी करण्यासाठी लोकांनी नियम पाळावेत


सातत्याने होणारे रस्ते अपघात कमी करायचे असतील तर रस्ते नियम पाळणे गरजेचे आहे. लोकांनी रस्त्यांचे नियम पाळलेच पाहिजे. लहान लहान गो्ष्टी जसे गाड्यांचा वेग मर्यादित ठेवणे, ड्रायव्हिंग करताना फोनवर न बोलणे, यांची काळजी घेतल्यास अशा दुर्घटना कमी होऊ शकतात.

Comments
Add Comment

Chrome Security Alert : Google Chrome वापरताय? थांबा...पहिलं हे काम करा, केंद्र सरकारचा हाय-अलर्ट

मुंबई : तुम्हीही रोजच्या कामासाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर 'गुगल क्रोम' (Google Chrome) ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री