Devendra Fadanvis : सगळ्याच गोष्टींना उद्धव ठाकरेंचा विरोध का?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल


नागपूर : सत्तेवरुन पायउतार झाल्यापासून उद्धव ठाकरे उठसूठ सगळ्याच गोष्टींना विरोध करत आहेत. मुंबईत मेट्रो कारशेडला विरोध केला. तर तिकडे कोकणात नाणारला ठाकरेंनी विरोध केला. त्याला पर्यायी जागा त्यांनीच पत्राद्वारे सरकारला सुचवली. मुंबईत धारावी पुनर्विकासासाठी असलेली पहिली निविदा देखील उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेच रद्द केली. त्यानंतर दुसरी निविदा काढली. त्याच्यावर उद्धव ठाकरे आक्षेप घेत आहेत. मात्र या निविदेतील अटी आणि शर्ती ठाकरे सरकारनेच तयार केल्या आहेत. कुठल्याही अटी शिंदे सरकारने बदललेल्या नाहीत. असे असतानाही उद्धव ठाकरेंचा विरोध का? सगळ्याच बाबतीत ते विरोध करताना दिसतात. सगळ्याच गोष्टींना त्यांचा विरोध असून विकासविरोधी भूमिका ठाकरे आणि विरोधक घेत असल्याचा आरोप करत मुंबईतील धारावी पुनर्विकासाच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जोरदार पलटवार केला.


धारावीतील लोकांना झुंजवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. गरिबातील गरिबांना घरं मिळता कामा नये, ते तिथेच खितपत पडून रहावे, यासाठी ठाकरे प्रयत्न करत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. आमच्या सरकारने पारदर्शकता आणली आहे. टीडीआरची विक्री ही आता कागदावर नव्हे तर डिजीटल पद्धतीने करावी लागणार हा बदल आम्ही केला आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा