Devendra Fadanvis : सगळ्याच गोष्टींना उद्धव ठाकरेंचा विरोध का?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल


नागपूर : सत्तेवरुन पायउतार झाल्यापासून उद्धव ठाकरे उठसूठ सगळ्याच गोष्टींना विरोध करत आहेत. मुंबईत मेट्रो कारशेडला विरोध केला. तर तिकडे कोकणात नाणारला ठाकरेंनी विरोध केला. त्याला पर्यायी जागा त्यांनीच पत्राद्वारे सरकारला सुचवली. मुंबईत धारावी पुनर्विकासासाठी असलेली पहिली निविदा देखील उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेच रद्द केली. त्यानंतर दुसरी निविदा काढली. त्याच्यावर उद्धव ठाकरे आक्षेप घेत आहेत. मात्र या निविदेतील अटी आणि शर्ती ठाकरे सरकारनेच तयार केल्या आहेत. कुठल्याही अटी शिंदे सरकारने बदललेल्या नाहीत. असे असतानाही उद्धव ठाकरेंचा विरोध का? सगळ्याच बाबतीत ते विरोध करताना दिसतात. सगळ्याच गोष्टींना त्यांचा विरोध असून विकासविरोधी भूमिका ठाकरे आणि विरोधक घेत असल्याचा आरोप करत मुंबईतील धारावी पुनर्विकासाच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जोरदार पलटवार केला.


धारावीतील लोकांना झुंजवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. गरिबातील गरिबांना घरं मिळता कामा नये, ते तिथेच खितपत पडून रहावे, यासाठी ठाकरे प्रयत्न करत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. आमच्या सरकारने पारदर्शकता आणली आहे. टीडीआरची विक्री ही आता कागदावर नव्हे तर डिजीटल पद्धतीने करावी लागणार हा बदल आम्ही केला आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य