शेतात म्हैस घुसल्याने वाद, एका मुलाचा मृत्यू, अनेक जखमी

लखनऊ: उत्तर प्रदेशात(uttar pradesh) खुले फिरणाऱ्या प्राण्यांमुळे शेतकरी खूप त्रस्त झाले आहेत आणि आपली शेतीची राखण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. ही जनावरे शेतात घुसल्यानंतक पिके उद्ध्वस्त कतात यातच गोंडा येथील एका शेतीत पाळीव प्राणी घुसल्याने वाद झाला. यात एका मुलाचा मृत्यू झाला. तर या घटनेत बरेच जण जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई सुरू केली आहे.


या घटनेतील जखमींना गोंडा जिल्ह्याच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. हे प्रकरण गोंडाच्या कौडिया ठाणे परिसरातील चकई पुरवा गावात घेडले. यात शेतात म्हैस घुसल्याच्या प्रकरणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील ९ जण जखमी झाले. यांना उपचारासाठी गोंडाच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत १५ वर्षीय राजकुमार उर्फ निरहू याचा मृत्यू झाला आहे.



म्हैस शेतात गेल्याने झाला वाद


दोन्ही गटांकडून दिलेल्या माहितीच्या आधारावर कौडिया बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केली आहे. या मुलाचा मृतदेह ताह्यात घेत पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की मंगळवारी संजू म्हशीला बांधण्यासाठी नेत ोता. त्यावेळेस म्हैस जवळच्या शेतात घुसली यावरून शेतीच्या मालकाने त्याला बरेच काही सुनावले. यानंतर दोन्ही गटात लाठीने हाणामारी झाली. यात अर्ध्या डझनहून अधिक जण जखमी झाले.



एका मुलाचा मृत्यू, अनेक जण जखमी


या प्रकरणी कर्नलगंज सर्किल ऑफिसर चंद्र प्रकाश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बगनाईच्या चकाई पुरावामध्ये पाळीव प्राण्याच्या शेतात घुसवण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. यात दोन मुलांसह अनेक लोक जखमी झाले होते. दोन्ही मुलांना चांगल्या उपचाासाठी आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. येथे त्यांच्यवर उपचार सुरू होते. काही लोकांना लखनऊला पाठवण्यात आले. दरम्यान, उपचार घेत असताना यातील १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

Comments
Add Comment

शबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ईडी’कारवाई

तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी नवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी

‘राष्ट्रगीता’वरून तामिळनाडूत हाय व्होल्टेज ड्रामा

राज्यपालांचा सभागृहातून सभात्याग नवी दिल्ली : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन

युएईच्या अध्यक्षांच्या तीन तासांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दिल्ली दौऱ्याने भारत-यूएई संबंधांना

नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल

देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी केले सादरीकरण नवी दिल्ली :

Indian Army : यावर्षी कर्तव्य पथावर दिसणार हे 'सहा शस्त्र' जी पाकिस्तानसह कोणत्याही शत्रूला भरवतील धडकी

नवी दिल्ली : भारताच्या कर्तव्य पाथ (प्रजासत्ताक दिन परेड) मध्ये यंदा देशाच्या संरक्षण आणि सामर्थ्याचे प्रदर्शन

भारतावर पुन्हा होणार दहशवादी हल्ला ? व्हायरल झालेल्या व्हिडीओमागचं सत्य आलं समोर

कराची : सोशल मीडियावर पाकिस्तानातून भारताला उद्देशून केलेले धमकीचे व्हिडीओ नवे नाहीत. मात्र सध्या व्हायरल होत