एकाच कुटुंबातील ४ लोकांनी केली सामूहिक आत्महत्या, वाराणसीमध्ये धक्कादायक घटना

वाराणसी: उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये एकाच कुटुंबातील चार लोकांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण गुरूवारी संध्याकाळी उशिरा समोर आले. आत्महत्या केलेल्यांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. आत्महत्या कशामुळे केली याबाबतचे कारण समोर आलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली.


मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या कैलाश भवनच्या तिसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. येथे एक महिला आणि तीन पुरुषांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत.


प्राथमिक माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेले हे चारही लोक आंध्र प्रदेशचे राहणारे आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. आता संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली जात आहे. पोलीस कैलाश भवनात चौकशी करत आहे.


पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही बोलावले. सर्व मृतदेह हाती घेण्यात आले. या घटनेबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली नाही.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च