एकाच कुटुंबातील ४ लोकांनी केली सामूहिक आत्महत्या, वाराणसीमध्ये धक्कादायक घटना

वाराणसी: उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये एकाच कुटुंबातील चार लोकांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण गुरूवारी संध्याकाळी उशिरा समोर आले. आत्महत्या केलेल्यांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. आत्महत्या कशामुळे केली याबाबतचे कारण समोर आलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली.


मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या कैलाश भवनच्या तिसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. येथे एक महिला आणि तीन पुरुषांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत.


प्राथमिक माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेले हे चारही लोक आंध्र प्रदेशचे राहणारे आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. आता संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली जात आहे. पोलीस कैलाश भवनात चौकशी करत आहे.


पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही बोलावले. सर्व मृतदेह हाती घेण्यात आले. या घटनेबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली नाही.

Comments
Add Comment

होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,