Madhya Pradesh News : बोअरवेलमध्ये अडकलेल्या पाचवर्षीय चिमुकलीची सात-आठ तासांनंतर झाली सुटका, मात्र रुग्णालयात...

राजगड : मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) एक दुःखदायक घटना घडली आहे. पाच वर्षांची एक चिमुरडी खेळत असताना बोअरवेलमध्ये (Borewell) पडल्याने तिला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. अखेर आज पहाटे सुटकेनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांची अवस्था फार बिकट झाली आहे.


मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात ही घटना घडली. माही असं या पाचवर्षीय चिमुकलीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंहगडमधील पिपलिया रसोडा गावात काल संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास माही आजोबांसोबत शेतात गेली होती. तिथे लहान मुलांसोबत खेळत असताना ती अचानक जुन्या बोअरवेलमध्ये पडली. तेथील स्थानिकांनी ताबडतोब प्रशासकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.


राजगडचे एसडीआरएफ (SDRF) पथक घटनास्थळी पोहोचले आणि जेसीबी आणि इतर उपकरणे मागवून बचावकार्य सुरू करण्यात आले. या घटनेवर स्वत: मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी सतत लक्ष ठेवले. मुलीला ऑक्सिजन पुरवण्याबरोबरच कॅमेरे लावून तिच्या हालचालींवरही लक्ष ठेवले जात होते. NDRF आणि SDRF टीमच्या पथकाला सुमारे ७ ते ८ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर आज पहाटे ३ वाजता माहीला बाहेर काढण्यात यश आले.


माहीला श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. तिला भोपाळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र तिथे माहीचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाचे सीएमएचओ डॉ. किरण वाडिया यांनी सांगितले की, आम्ही मुलीला राजगड येथून थेट रुग्णालयात आणले, मात्र तिचा जीव वाचू शकला नाही. तब्बल नऊ तास माही सुमारे तीस फूट खोल बोअरवेलच्या खड्ड्यात जीवन-मरणाची झुंज देत होती, पण अखेर तिचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा