Health tips: थंडीच्या दिवसात गरम नको थंड पाण्याने करा आंघोळ, होतील खूप फायदे

मुंबई: थंडीचा कडाका वाढू लागला की पाण्यात हात घालवत नाही. त्यामुळे अनेकजण गरम पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात. गरम पाण्याने शरीराला आराम मिळतो आणि उबदारपणा मिळतो. दरम्यान, फार कमी लोकांना मााहीत आहे की गरम पाण्याची आंघोळ केल्याने केस आणि त्वचेचे नुकसान होते.


गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतून मॉईश्चर आणि नैसर्गिक तेल साफ होते. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो. यामुळे केसांचा रुक्षपणा वाढतो. यामुळे थंड अथवा नॉर्मल पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. तज्ञही थंड पाण्याने त्वचा आणि केस धुण्याचा सल्ला देतात.


केस राहतात निरोगी - गरम पाण्याने आंघोळ केल्याने केसांचा रुक्षपणा वाढतो. तसेच केस निर्जीव होतात. अनेकदा केस गळू लागतात. अशातच थंड पाण्याने आंघोळ करावी. यामुळे केस निरोगी बनतात. थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे केसांची त्वचा आणि केसांचा रोमछिद्रे खुलतात.


केसांचा स्काल्प सुधारतो - गरम पाण्याने आंघोळ केल्याने केसांची त्वचा कोरडी होते. तसेच केसांत कोंडा आणि खाज येते. याउलट थंड पाण्याने आंघोळ केल्यास असे होत नाही.


अॅलर्जी कमी होते. थंड पाणी खाज येत असलेल्या त्वचेवर पडल्यास सूज कमी होते. यामुळे खाजेची समस्याही दूर होते. त्वचेची जळजळही थंड पाण्याने कमी होते.


त्वचेची रोमछिद्रे सुधारतात - थंड पाण्याने आंघोळ केल्यास अनेक फायदे होतात. यामुळे त्वचेमध्ये एक लवचिकपणा येतो. थंड पाण्याने आंघोळ केल्याने रोमछिद्रे खुली होतात. तसेच सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी होतात.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.