Health tips: थंडीच्या दिवसात गरम नको थंड पाण्याने करा आंघोळ, होतील खूप फायदे

मुंबई: थंडीचा कडाका वाढू लागला की पाण्यात हात घालवत नाही. त्यामुळे अनेकजण गरम पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात. गरम पाण्याने शरीराला आराम मिळतो आणि उबदारपणा मिळतो. दरम्यान, फार कमी लोकांना मााहीत आहे की गरम पाण्याची आंघोळ केल्याने केस आणि त्वचेचे नुकसान होते.


गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतून मॉईश्चर आणि नैसर्गिक तेल साफ होते. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो. यामुळे केसांचा रुक्षपणा वाढतो. यामुळे थंड अथवा नॉर्मल पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. तज्ञही थंड पाण्याने त्वचा आणि केस धुण्याचा सल्ला देतात.


केस राहतात निरोगी - गरम पाण्याने आंघोळ केल्याने केसांचा रुक्षपणा वाढतो. तसेच केस निर्जीव होतात. अनेकदा केस गळू लागतात. अशातच थंड पाण्याने आंघोळ करावी. यामुळे केस निरोगी बनतात. थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे केसांची त्वचा आणि केसांचा रोमछिद्रे खुलतात.


केसांचा स्काल्प सुधारतो - गरम पाण्याने आंघोळ केल्याने केसांची त्वचा कोरडी होते. तसेच केसांत कोंडा आणि खाज येते. याउलट थंड पाण्याने आंघोळ केल्यास असे होत नाही.


अॅलर्जी कमी होते. थंड पाणी खाज येत असलेल्या त्वचेवर पडल्यास सूज कमी होते. यामुळे खाजेची समस्याही दूर होते. त्वचेची जळजळही थंड पाण्याने कमी होते.


त्वचेची रोमछिद्रे सुधारतात - थंड पाण्याने आंघोळ केल्यास अनेक फायदे होतात. यामुळे त्वचेमध्ये एक लवचिकपणा येतो. थंड पाण्याने आंघोळ केल्याने रोमछिद्रे खुली होतात. तसेच सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी होतात.

Comments
Add Comment

२६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवांचा विस्तार; दररोजसाठी वाढणार इतक्या फेऱ्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. २६ जानेवारी २०२६ पासून पश्चिम

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल — उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या

मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार

44-Hour Water Block : मुंबईतील धारावीसह पूर्व आणि पश्चिम उपनगर येत्या मंगळवारपासून ४४ तासांचा पाणी ब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.