Dinesh Fadnis : CID मध्ये फ्रेडरिक्सची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते दिनेश फडणीस यांचं निधन

वयाच्या ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


मुंबई : सोनी टीव्हीवरील (Sony TV) सीआयडीसारख्या (CID Crime Show) लोकप्रिय मालिकेतून गेली २० वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे फ्रेडरिक्स म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते दिनेश फडणीस (Dinesh Fadnis) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर काल रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.


दिनेश फडणीस हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना यकृत, हृदय आणि किडनीचा त्रास होता आणि त्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत होता. दिनेश फडणीस हे ३० नोव्हेंबरपासून कांदिवलीतील तुंगा रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, काल रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.


सीआयडी या प्रदीर्घ काळ चालणार्‍या शोची संपूर्ण स्टारकास्ट त्यांच्या निवासस्थानी पोहचली आहे. दिनेश फडणीस यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. चाहते आणि कलाकार पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.


दिनेश फडणीस १९९८ मध्ये सीआयडी शो सुरू झाल्यापासून या शोसोबत जोडले गेले होते आणि सीआयडीच्या दोन दशकांच्या प्रवासात ते नेहमीच शोमध्ये दिसले. या २० वर्षांत आपल्या व्यक्तिरेखेने त्यांनी लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांनी अदालत, सीआयडी स्पेशल ब्युरो, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकांमध्ये काम केले आहे. टीव्ही शो व्यतिरिक्त त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केल्याची माहिती आहे. ते आमिर खानच्या चित्रपट 'सरफरोश' आणि हृतिक रोशनच्या 'सुपर ३०'मध्येही दिसले.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला