INDIA Alliance Meeting : शेवटी घमंडियांची बैठक रद्दच झाली!

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी उद्या दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक (INDIA Alliance Meeting) बोलावली होती. पण या बैठकीला अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार नसल्याचे समजले. त्यामुळे इंडिया आघाडीत सर्व काही आलबेल नाही हे दिसून आले. अखेर उद्या होणारी बैठक मिचाँग चक्रीवादळामुळे (Michaung Cyclone) रद्द करण्यात आल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे. पण महत्त्वाच्या नेत्यांची अनुपस्थिती हेच बैठक रद्द होण्यामागील मुख्य कारण असल्याची चर्चा आहे.


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) आजारी असल्याने बैठकीला येऊ शकणार नसल्याचे म्हटले होते. शिवाय अखिलेश यादव (Akhilesh Yadav) नाराज असल्याने तेही येणार नाहीत, असं राऊत म्हणाले. तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना या बैठकीबद्दल माहितच नव्हतं, असं त्या म्हणाल्या. थोडक्यात, इंडिया आघाडीतील संवाद बिघडला आहे, हे स्पष्ट झाले आहे.


दरम्यान, इंडिया आघाडीतील घटक पक्षांना काँग्रेसने विश्वासात घेतलं नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळेच नितीश कुमार, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी नाराज आहेत. तसेच आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन (Stalin) यांनीही मिचाँग चक्रीवादळामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याचं कळवलं. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक रद्द करण्यात आली आहे.


बुधवारी होणाऱ्या बैठकीला जरी मोठे नेते उपस्थित राहू शकणार नसले तरीही त्या ठिकाणी आता एक अनौपचारिक बैठक होणार असल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. तसेच उद्या होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं काँग्रेसने सांगितलं आहे.

Comments
Add Comment

Manipur: मणिपूरमध्ये वेगवेगळ्या कारवाईत १० दहशतवाद्यांना अटक

गेल्या २४ तासांत मणिपूरच्या विविध भागात पोलिस आणि सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दोन महिलांसह दहा

Kedarnath Dham: महाशिवरात्रीच्या दिवशी केदारनाथ संस्थेने केली मोठी घोषणा; केदारनाथ धामचे दरवाजे 'या' दिवशी उघडणार

रविवार १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या निमित्ताने केदारनाथ संस्थेकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. या

Indian Student in America: कॅलिफोर्नियामध्ये बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सहा दिवसांनी सापडला

बंगळुरू: अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यात बेपत्ता झालेल्या २२ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

Krishna Heritage Tower : भारतात उभे राहणार ४३० फुटांचे सर्वात उंच आध्यात्मिक स्थळ; लवकरच साकारणार 'हरे कृष्ण हेरिटेज टॉवर'

हैदराबाद : आपले गजबजलेले रस्ते, शतकानुशतके जुने वास्तूशिल्प आणि लज्जतदार खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेले

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र