नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी उद्या दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक (INDIA Alliance Meeting) बोलावली होती. पण या बैठकीला अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार नसल्याचे समजले. त्यामुळे इंडिया आघाडीत सर्व काही आलबेल नाही हे दिसून आले. अखेर उद्या होणारी बैठक मिचाँग चक्रीवादळामुळे (Michaung Cyclone) रद्द करण्यात आल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे. पण महत्त्वाच्या नेत्यांची अनुपस्थिती हेच बैठक रद्द होण्यामागील मुख्य कारण असल्याची चर्चा आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) आजारी असल्याने बैठकीला येऊ शकणार नसल्याचे म्हटले होते. शिवाय अखिलेश यादव (Akhilesh Yadav) नाराज असल्याने तेही येणार नाहीत, असं राऊत म्हणाले. तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना या बैठकीबद्दल माहितच नव्हतं, असं त्या म्हणाल्या. थोडक्यात, इंडिया आघाडीतील संवाद बिघडला आहे, हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीतील घटक पक्षांना काँग्रेसने विश्वासात घेतलं नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळेच नितीश कुमार, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी नाराज आहेत. तसेच आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन (Stalin) यांनीही मिचाँग चक्रीवादळामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याचं कळवलं. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक रद्द करण्यात आली आहे.
बुधवारी होणाऱ्या बैठकीला जरी मोठे नेते उपस्थित राहू शकणार नसले तरीही त्या ठिकाणी आता एक अनौपचारिक बैठक होणार असल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. तसेच उद्या होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं काँग्रेसने सांगितलं आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…