BJP Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे किती रडारड करणार?

भाजपाचा परखड सवाल


मुंबई : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींमध्ये (Assembly Elections) काँग्रेस (Congress) एकट्या तेलंगणामध्ये विजय मिळवू शकली, तर मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाचा (BJP) दणदणीत विजय झाला. यावर विरोधक ईव्हीएम मशीनवर (EVM Machine) शंका उपस्थित करत आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील भाजपवर टीका केली होती. त्याला आता भाजपने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन (X Account) एक पोस्ट करत भाजपाने उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.


भाजपाच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्वाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे. राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही बनाऐंगे लेकीन तारीख नहीं बताऐंगे अशी टीका तुम्हीच केली होती पण आता २२ जानेवारी रोजी मंदिराचं लोकार्पण होतंय. त्यामुळे तुमच्या पोटात गोळा उठला आहे, अशी जहरी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.





पुढे या पोस्टमध्ये लिहिले आहे, कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की इव्हीएमवर शंका. उद्धव ठाकरे, किती रडारड करणार?, असा परखड सवाल उपस्थित करत भाजपाने उद्धव ठाकरेंना सुनावले आहे.

Comments
Add Comment

Fire Station : चांदिवलीमध्ये अग्निशमन दलाची होणार उभारणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) चांदिवली (Chandiwali)  येथे नव्याने अग्निशमन केंद्र (Fire station) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या

BMC News : सखल भागांमध्ये अश्वशक्तीने महापालिका करणार प्रयत्न, साचलेले पाणी उचलून फेकणार

- मुंबईतील आठ ठिकाणी पुढील तीन वर्षांसाठी भाडेतत्वावर पंपाची सुविधा - तब्बल १२३ कोटी रुपये करणार खर्च मुंबई (सचिन

BMC News : रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल १४ कंत्राटदारांची निवड, यंदा केवळ ४२ कोटींचीच कामे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या मोठ्याप्रमाणात सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आल्यामुळे

Tree Plantation on Coastal Road : विस्तारीत कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पात १७७८ झाडे बाधित, बदल्यात लावणार सुमारे १६ हजार झाडे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई किनारी रस्ते प्रकल्प (उत्तर) वर्सोवा आंतरबदल ते दहिसर भाईंदर मार्गावरील दहिसर

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! नव्या आरक्षण प्रणालीमुळे तिकीट बुकिंग होणार अधिक सोपं

मुंबई : भारतीय रेल्वे (Indian Railways) प्रवाशांसाठी एक मोठं तांत्रिक अपग्रेड (Technological Upgrade) घेऊन येत आहे. तब्बल ४० वर्षांपासून

Crime News: भाईंदरमध्ये खळबळ! खारफुटीत सापडलेल्या जळालेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा उलगडा, तीन सख्खे भाऊ अटकेत

भाईंदर : भाईंदर (Bhayandar) पूर्व परिसरातील खारफुटीच्या जंगलात सापडलेल्या जळालेल्या आणि कुजलेल्या मृतदेहाच्या (Deathbody)