Cyclone Michaung: मिचाँग वादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट ,चेन्नईत ५ जणांचा मृत्यू

Share

नवी दिल्ली: देशातील दाक्षिणात्या राज्यात मिचाँग चक्रीवादळाचा(Cyclone Michaung)कहर पाहायला मिळत आहे. चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे घडलेल्या दुर्घटनामध्ये कमीत कमी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रनवेवर पाणी भरल्याने विमानतळावरून उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी या वादळाचे गंभीर चक्रीवादळात रुपांतर झाले आणि मंगळवारी सकाळी दक्षिणी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला पार करण्याची शक्यता आहे.

सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मिचाँग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या आव्हानांबाबत तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पाँडिचेरीच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यांनी या स्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासनही दिले.

अमित शाह यांची सोशल मीडियावर पोस्ट

त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री श्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यासोबत मिचाँग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच त्यावरील उपायांबाबक चर्चा झाली. लोकांचा जीव वाचवणे ही पहिली प्राथमिकता आहे. केंद्र सरकार आँध्र प्रदेशला सर्व हवी ती मदत पुरवण्यासाठी तयार आहे. राज्यात एनडीआरएफचे जवान आधीच कमी आहेत. गरज पडल्यास आम्ही मदतीसाठी आणखी टीम्स तयार ठेवल्या आहेत.

रस्त्यावर आल्या मगर

चेन्नईमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. सखल भागात पाणी साचल्याने येथे रस्त्यांवर मगरी पाहायला मिळाल्या. याशिवाय शहरातील अनेक मेट्रो स्टेशनजवळ पाणी साचले . सेंट थॉमस मेट्रो स्टेशनवर ४ फुटांपर्यंत पाणी जमा झाले होते. स्टेशनमध्ये घुसण्याचा मार्गच बंद ाला.

हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

५ डिसेंबरला आयएमडीने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मलकानगिरी, कोरापूट, रायगडा, गजपती आणि गंजम या पाचा जिल्ह्यामधील एक अथवा दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

1 hour ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

2 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

2 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

3 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

4 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

4 hours ago