Cyclone Michaung: मिचाँग वादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट ,चेन्नईत ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली: देशातील दाक्षिणात्या राज्यात मिचाँग चक्रीवादळाचा(Cyclone Michaung)कहर पाहायला मिळत आहे. चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे घडलेल्या दुर्घटनामध्ये कमीत कमी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रनवेवर पाणी भरल्याने विमानतळावरून उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी या वादळाचे गंभीर चक्रीवादळात रुपांतर झाले आणि मंगळवारी सकाळी दक्षिणी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला पार करण्याची शक्यता आहे.


सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मिचाँग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या आव्हानांबाबत तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पाँडिचेरीच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यांनी या स्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासनही दिले.



अमित शाह यांची सोशल मीडियावर पोस्ट


त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री श्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यासोबत मिचाँग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच त्यावरील उपायांबाबक चर्चा झाली. लोकांचा जीव वाचवणे ही पहिली प्राथमिकता आहे. केंद्र सरकार आँध्र प्रदेशला सर्व हवी ती मदत पुरवण्यासाठी तयार आहे. राज्यात एनडीआरएफचे जवान आधीच कमी आहेत. गरज पडल्यास आम्ही मदतीसाठी आणखी टीम्स तयार ठेवल्या आहेत.



रस्त्यावर आल्या मगर


चेन्नईमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. सखल भागात पाणी साचल्याने येथे रस्त्यांवर मगरी पाहायला मिळाल्या. याशिवाय शहरातील अनेक मेट्रो स्टेशनजवळ पाणी साचले . सेंट थॉमस मेट्रो स्टेशनवर ४ फुटांपर्यंत पाणी जमा झाले होते. स्टेशनमध्ये घुसण्याचा मार्गच बंद ाला.



हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट


५ डिसेंबरला आयएमडीने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मलकानगिरी, कोरापूट, रायगडा, गजपती आणि गंजम या पाचा जिल्ह्यामधील एक अथवा दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

Delhi Crime : धक्कादायक! चालत्या गाडीत विवाहित प्रेयसीची क्रूर हत्या; थेट शीर कापले, मृतदेह नाल्यात फेकला अन्...

दिल्ली : नोएडामध्ये घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण परिसर तसेच पोलीस प्रशासनाला हादरवून सोडले आहे.

PM Kisan Yojana : बिहारमध्ये 'विजयाच्या त्सुनामी'नंतर PM मोदींचं मोठं गिफ्ट! ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

बिहार : बिहार निवडणुकीत एनडीएच्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

Nowgam Police Station Blast : चार दिवसांत देशाला दुहेरी धक्का! श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशन स्फोटाचे नेमकं कारण काय?

श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी i-२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा

बिहारमध्ये भाजप अव्वल, महाराष्ट्रासह १३ राज्यांवर भाजपची सत्ता! जाणून घ्या सविस्तर...

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला.