Cyclone Michaung: मिचाँग वादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट ,चेन्नईत ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली: देशातील दाक्षिणात्या राज्यात मिचाँग चक्रीवादळाचा(Cyclone Michaung)कहर पाहायला मिळत आहे. चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे घडलेल्या दुर्घटनामध्ये कमीत कमी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रनवेवर पाणी भरल्याने विमानतळावरून उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी या वादळाचे गंभीर चक्रीवादळात रुपांतर झाले आणि मंगळवारी सकाळी दक्षिणी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला पार करण्याची शक्यता आहे.


सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मिचाँग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या आव्हानांबाबत तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पाँडिचेरीच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यांनी या स्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासनही दिले.



अमित शाह यांची सोशल मीडियावर पोस्ट


त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री श्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यासोबत मिचाँग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच त्यावरील उपायांबाबक चर्चा झाली. लोकांचा जीव वाचवणे ही पहिली प्राथमिकता आहे. केंद्र सरकार आँध्र प्रदेशला सर्व हवी ती मदत पुरवण्यासाठी तयार आहे. राज्यात एनडीआरएफचे जवान आधीच कमी आहेत. गरज पडल्यास आम्ही मदतीसाठी आणखी टीम्स तयार ठेवल्या आहेत.



रस्त्यावर आल्या मगर


चेन्नईमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. सखल भागात पाणी साचल्याने येथे रस्त्यांवर मगरी पाहायला मिळाल्या. याशिवाय शहरातील अनेक मेट्रो स्टेशनजवळ पाणी साचले . सेंट थॉमस मेट्रो स्टेशनवर ४ फुटांपर्यंत पाणी जमा झाले होते. स्टेशनमध्ये घुसण्याचा मार्गच बंद ाला.



हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट


५ डिसेंबरला आयएमडीने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मलकानगिरी, कोरापूट, रायगडा, गजपती आणि गंजम या पाचा जिल्ह्यामधील एक अथवा दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे