MPमधील बंपर विजयानंतर मुख्यमंत्री शिवराज यांनी कुटुंबियासोबत घालवला वेळ, हॉटेलमध्ये खाल्ले छोले-भटुरे

भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये(madhya pradesh) विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. भाजपने दमदाररित्या पुन्हा सत्तेत पुनरागमन केले आहे. मध्य प्रदेशातील २३० जागांपैकी १६३ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर काँग्रेसच्या खात्यात केवळ ६६ जागा आल्या. मध्य प्रदेशात पुन्हा भाजपचे कमळ फुलले आणि दीर्घकाळच्या निवडणुकीच्या धावपळीनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सोमवारी संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसले.


सीएम शिवराज सिंह चौहान यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे यात ते आपल्या कुटुंबियांसह रेस्टॉरंटमध्ये जेवताना दिसत आहे. सीएम शिवराज सिंह आपली पत्नी आणि दोन मुलांसह एमपीनगर येथील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करताना दिसले. रेस्टॉरंटमधून बाहेर निघून सीएम शिवराज सिंह म्हणाले की मला लोकांमध्ये चांगले वाटले. आम्ही संपूर्ण कुटुंब एक आहोत. मला आनंद आहे की जेवण करताना मला लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.


 




सीएम शिवराज सिंह भोपाळच्या एका रेस्टॉरंटमध्ये एका मुलाच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात सहभागी झाले होते. ते म्हणाले, कधी-कधी अशा पद्धतीने बाहेर पडायला चांगले वाटते.


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिले की आयुष्यात खूप धावपळ आहे मात्र जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कुटुंबासोबत काही क्षण घालवावेत. आठवणींना उजाळा द्यावा. हे अनमोल मोती आहे जे आपले जीवन उजळून टाकतात.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या