Singham Again : बॉलिवूडच्या सिंघमला शूटिंगदरम्यान दुखापत; पण ठरवलं 'शो मस्ट गो ऑन'!

  109

मुंबई : बॉलिवूडचा (Bollywood) सिंघम म्हणजेच अजय देवगण (Ajay Devgan) त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या सिनेमाचे पोस्टर आणि यातील कलाकार समोर आल्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते भलतेच उत्सुक आहेत. मात्र, या सिनेमाच्या सेटवर अजयला शूटिंगदरम्यान दुखापत झाली. एक अॅक्शन सीक्वेन्स (Action Sequence) शूट करत असताना अजयच्या डोळ्याला जखम झाली.


सिंघमनंतर सिंघम रिटर्न्स (Singham Returns) हा चित्रपटही प्रचंड गाजला. यानंतर आता सिंघम अगेनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचसोबत साधारण त्याच धाटणीचा रणवीर सिंगचा (Ranveer Singh) सिम्बाही (Simmba) प्रेक्षकांना आवडला. त्यामुळे या दोन्ही सिनेमांचा दिग्दर्शक बॉलिवूडचा लोकप्रिय रोहित शेट्टी (Rohit Shetty) सगळ्यांचा आवडता बनला आहे. एकावर एक हिट सिनेमे देण्यासाठी तो प्रसिद्ध आहे.


सिंघम अगेनसाठी रोहित शेट्टी आणि त्याची टीम मुंबईतील विले पार्ले परिसरात शूटिंग करत होती. दरम्यान अॅक्शन सीन शूट करताना अजय देवगणच्या डोळ्याला दुखापत झाली. अजय देवगण एक कॉम्बैट सीक्वेंस शूट करत होता. त्यावेळी त्याच्या डोळ्याला दुखापत झाली.


हा अपघात झाल्यानंतर अजय देवगणने थोडा वेळ ब्रेक घेतला. सेटवर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. दरम्यान रोहितने खलनायकांवर आधारित असलेल्या काही दृश्यांचं शूटिंग पूर्ण केलं. कामाला प्राधान्य देणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अजयची गणना होते. यंदादेखील त्याने आधी 'शो मस्ट गो ऑन' असं म्हणत नियोजित शूटिंग पूर्ण केलं.


'सिंघम अगेन' या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. अजयसह करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि दीपिका पादुकोणदेखील (Deepika Padukone) या सिनेमाचा भाग आहेत. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अक्षय कुमारदेखील (Akshay Kumar) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'सिंघम अगेन'ची घोषणा झाल्यापासून चाहते या सिनेमाची वाट पाहत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.