Ruturaj Gaikwad: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने रचला इतिहास, दिग्गजांना टाकले मागे

मुंबई: ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने भारतीय दिग्गजांसह जगभरातील सर्व दिग्गजांना मागे टाकले आहे. गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत ५५.७५च्या सरासरीने आणि १५९.२९च्या स्ट्राईक रेटने एकूण २२३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या नाबाद १२३ धावांच्या खेळीचाही समावेश आहे.


क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिलच्या नावावर होत्या मात्र ऋतुराजने त्यालाही मागे टाकले आहे. याशिवाय या यादीत भारताच्या युवा फलंदाजाने विराट कोहली आणि डेवॉन कॉन्वेलाही मागे टाकले आहे.



टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे खेळाडू


ऋतुराज गायकवाड - २२३ धावा
मार्टिन गप्टिल - २१८ धावा
विराट कोहली - १९९ धावा
डेवॉन कॉन्वे - १९२ धावा



भारतासाठी एका टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


भारतासाठी एका टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा कऱण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी करत ऋतुराज गायकवाडने त्यालाही मागे टाकले आहे. या यादीत सर्वात पहिल्या स्थानावर विराट कोहली, त्यानंतर केएल राहुल आणि मग ऋतुराज गायकवाड यांच्या नावाचा समावेश आहे. या तीन खेळाडूंनी ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा कऱण्याचा रेकॉर्ड केला आहे.


विराट कोहली - २३१ धावा विरुद्ध इंग्लंड
केएल राहुल - २२४ धावा विरुद्ध न्यूझीलंड
ऋतुराज गायकवाड - २२३ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख