Ruturaj Gaikwad: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने रचला इतिहास, दिग्गजांना टाकले मागे

  98

मुंबई: ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने भारतीय दिग्गजांसह जगभरातील सर्व दिग्गजांना मागे टाकले आहे. गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत ५५.७५च्या सरासरीने आणि १५९.२९च्या स्ट्राईक रेटने एकूण २२३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या नाबाद १२३ धावांच्या खेळीचाही समावेश आहे.


क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिलच्या नावावर होत्या मात्र ऋतुराजने त्यालाही मागे टाकले आहे. याशिवाय या यादीत भारताच्या युवा फलंदाजाने विराट कोहली आणि डेवॉन कॉन्वेलाही मागे टाकले आहे.



टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे खेळाडू


ऋतुराज गायकवाड - २२३ धावा
मार्टिन गप्टिल - २१८ धावा
विराट कोहली - १९९ धावा
डेवॉन कॉन्वे - १९२ धावा



भारतासाठी एका टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


भारतासाठी एका टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा कऱण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी करत ऋतुराज गायकवाडने त्यालाही मागे टाकले आहे. या यादीत सर्वात पहिल्या स्थानावर विराट कोहली, त्यानंतर केएल राहुल आणि मग ऋतुराज गायकवाड यांच्या नावाचा समावेश आहे. या तीन खेळाडूंनी ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा कऱण्याचा रेकॉर्ड केला आहे.


विराट कोहली - २३१ धावा विरुद्ध इंग्लंड
केएल राहुल - २२४ धावा विरुद्ध न्यूझीलंड
ऋतुराज गायकवाड - २२३ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया

Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे