Ruturaj Gaikwad: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने रचला इतिहास, दिग्गजांना टाकले मागे

मुंबई: ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने भारतीय दिग्गजांसह जगभरातील सर्व दिग्गजांना मागे टाकले आहे. गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत ५५.७५च्या सरासरीने आणि १५९.२९च्या स्ट्राईक रेटने एकूण २२३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या नाबाद १२३ धावांच्या खेळीचाही समावेश आहे.


क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिलच्या नावावर होत्या मात्र ऋतुराजने त्यालाही मागे टाकले आहे. याशिवाय या यादीत भारताच्या युवा फलंदाजाने विराट कोहली आणि डेवॉन कॉन्वेलाही मागे टाकले आहे.



टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे खेळाडू


ऋतुराज गायकवाड - २२३ धावा
मार्टिन गप्टिल - २१८ धावा
विराट कोहली - १९९ धावा
डेवॉन कॉन्वे - १९२ धावा



भारतासाठी एका टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


भारतासाठी एका टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा कऱण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी करत ऋतुराज गायकवाडने त्यालाही मागे टाकले आहे. या यादीत सर्वात पहिल्या स्थानावर विराट कोहली, त्यानंतर केएल राहुल आणि मग ऋतुराज गायकवाड यांच्या नावाचा समावेश आहे. या तीन खेळाडूंनी ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा कऱण्याचा रेकॉर्ड केला आहे.


विराट कोहली - २३१ धावा विरुद्ध इंग्लंड
केएल राहुल - २२४ धावा विरुद्ध न्यूझीलंड
ऋतुराज गायकवाड - २२३ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया

Comments
Add Comment

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय