IND vs AUS: बंगळुरूत आज भिडणार भारत-ऑस्ट्रेलिया

  80

बंगळुरू: भारत(india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना बंगळुरूत खेळवला जाणार आहे. येथील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आज संध्याकाळी ७ वाजता दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. या मालिकेतील गेल्या चार सामन्यांत ज्या पद्धतीने धावांचा पाऊस पडला आहे त्यापेक्षा अधिक धावा आजच्या सामन्यात बरसू शकतात.


गेल्या काही वर्षात येथील मैदाना फलंदाजांसाठी अतिशय फायदेशीर ठरले आहे. येथील पिच सपाट आहे ज्यामुळे बॉलवर सोप्या पद्धतीने बॅटवर येतो. बाऊंड्रीज लहान आहे या कारणामुळे फलंदाजाला सिक्सर ठोकण्यात भीती वाटत नाही. येथील टी-२० दोनशेहून अधिकचा स्कोर बनणे शक्य आहे. या पिचवर धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणे कठीण नाही.



कशी असेल पिच?


आजच्या सामन्यात पिचची स्थिती अशीच काहीशी असेल. सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण असेल आणि हवामानातही आर्द्रता असेल. यामुळे वेगवान गोलंदाजांना थोडीफार मदत मिळू शकते. मात्र आर्द्रतेमुळे हे प्रमाण कमी असेल. या मैदानावर गेल्या आयपीएलच्या १४ सामन्यांत पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने ९ वेळा १८०हून अधिक स्कोर पार केला आहे. विश्वचषक २०२३मध्येही येथे चौकार-षटकारांचा पाऊस पडला. आजच्या सामन्यातही हेच चित्र पाहायला मिळू शकते.



येथे चेज करणे होईल सोपे


या मैदानावर आतापर्यंत आठ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यातील एक सामना अनिर्णीत राहिला. सात सामने येथे पार पडले आहेत त्यात चेज करणारा संघ अधिक यशस्वी ठरला. पाच सामन्यात नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला यश मिळाले आहेत.



टीम इंडियाला ३-१ अशी विजयी आघाडी


भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत आधीच ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. म्हणजेच भारताने आधीच ही मालिका आपल्या नावे केली आहे.

Comments
Add Comment

देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बंगळुरूमध्ये उभारले जाणार

बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील बोम्मासंद्राच्या सूर्या सिटीमध्ये एक भव्य

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडणार?

चेन्नईकडून खेळण्याची शक्यता, अश्विनही संघातून बाहेर पडण्याच्या विचारात चेन्नई  : संजू सॅमसनने राजस्थान

'या' पाकिस्तानी क्रिकेटरला बलात्काराच्या आरोपात ब्रिटनमध्ये अटक

नवी दिल्ली: पाकिस्तानचा २४ वर्षीय क्रिकेटर हैदर अलीला बलात्कार प्रकरणात ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे.

आशिया कप हॉकी स्पर्धेतून पाकिस्तान संघाची माघार; भारतात येऊन खेळण्यास नकार

नवी दिल्ली : आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील तिढा सुटला असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप हॉकी

मोहम्मद सिराज आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावर

इंग्लंड मालिकेमुळे सिराजची १२ स्थानाची झेप नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी