IND vs AUS: भारताची मालिकेत विजयी आघाडी, चौथ्या सामन्यात भारताचा विजय

  109

रायपूर: भारत(india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात रंगलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेतील चार सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय मिळवत ही मालिका खिशात घातली आहे.

भारताने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला मालिकेत पराभव करत घेतला. भारताने चौथ्या सामन्यात ९ बाद १७४ धावा केल्या होत्या. मात्र ऑस्ट्रेलियाला २० षटकांत ७ बाद १५४ धावा करता आल्या.

भारताकडून रिंकू सिंहने सर्वाधिक ४६ धावा केल्या. तर जितेश शर्माने त्याला चांगली साथ देत ३५ धावांची खेळी केली. भारताची सुरूवात चांगली झाली. भारताच्या सलामीवीरांनी जयश्वी जायसवालने ३७ धावा तर ऋतुराज गायकवाडने ३२ धावा करत चांगली सुरूवात करून दिली. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर भारताचे काही विकेट झटपट पडले. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवला या सामन्यात केवळ एक धाव करता आली.

१७५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघाची सुरूवात डळमळीत झाली. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून ट्रेविस हेडने ३१ धावा केल्या तर मॅथ्यू वेडने नाबाद ३६ धावा केल्या. मात्र त्याच्या या धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत.
Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये