IND vs AUS: भारताची मालिकेत विजयी आघाडी, चौथ्या सामन्यात भारताचा विजय

रायपूर: भारत(india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात रंगलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेतील चार सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय मिळवत ही मालिका खिशात घातली आहे.

भारताने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला मालिकेत पराभव करत घेतला. भारताने चौथ्या सामन्यात ९ बाद १७४ धावा केल्या होत्या. मात्र ऑस्ट्रेलियाला २० षटकांत ७ बाद १५४ धावा करता आल्या.

भारताकडून रिंकू सिंहने सर्वाधिक ४६ धावा केल्या. तर जितेश शर्माने त्याला चांगली साथ देत ३५ धावांची खेळी केली. भारताची सुरूवात चांगली झाली. भारताच्या सलामीवीरांनी जयश्वी जायसवालने ३७ धावा तर ऋतुराज गायकवाडने ३२ धावा करत चांगली सुरूवात करून दिली. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर भारताचे काही विकेट झटपट पडले. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवला या सामन्यात केवळ एक धाव करता आली.

१७५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघाची सुरूवात डळमळीत झाली. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून ट्रेविस हेडने ३१ धावा केल्या तर मॅथ्यू वेडने नाबाद ३६ धावा केल्या. मात्र त्याच्या या धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत.
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत