कोसळलेल्या पुलाच्या हद्दीवरून रेल्वे, बांधकाम विभागात वाद, नागरिकांकडून नव्या पुलाची मागणी

Share

केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केली अधिकाऱ्यांची कान उघडणी

मनमाड : मनमाड शहरातील दोन भागांना जोडणारा रेल्वे ब्रिज २९ नोव्हेंबरच्या पहाटे पाचच्या सुमारास पुलाकडील भाग पडल्याने इंदोर पुणे महामार्ग पूर्णपणे बंद झाला असून वाहनधारकांचे व स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून सर्वपक्षीय नेत्यांकडून वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही रेल्वे व बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले.

आता या ब्रिजचे दुरुस्तीचे काम सुरू झाले पण स्थानिक नागरिकांनी याला विरोध करत पुलाची नव्याने निर्मिती करण्यात यावी असा एकच हट्ट धरला आहे.

आज या पुलाची पाहणी करण्याकरिता आलेल्या केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधत अधिकाऱ्यांना बे जबाबदार धरत धारेवर धरले. पुलाच्या दुरुस्तीबाबत कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही. दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई देखील केली जाईल, मी सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून तसेच पुलाच्या नवीन निर्मिती बाबत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करून लवकरात लवकर निधी उपलब्ध होईल, त्याचा पाठपुरावा करणार, जनतेला होणाऱ्या त्रासातून लवकरात लवकर मुक्त करणार, असे आश्वासन मंत्री भारती पवार यांनी दिले आहे.

यावेळी पुलाच्या पाहणी दरम्यान मोठ्या संख्येने रेल्वे अधिकारी व बांधकाम विभागाचे अधिकारी व पोलीस प्रशासनास तसेच स्थानिक पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“पुलाच्या कामाबाबत लवकरात लवकर केंद्रीय व रोड परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा करून निधीबाबत पाठपुरावा करणार व तात्पुरत्या स्वरूपात ब्रिजचे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मुक्त करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना देत अधिकाऱ्यांची कान उघडली केली असून कोणत्याही अधिकाऱ्यांची गाय केली जाणार नाही दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.” – डॉ. भारती पवार, केंद्रीय कुटुंब कल्याण राज्यमंत्री

Recent Posts

पाक नागरिकांच्या व्हिसाला स्थगिती, ४८ तासांत देश सोडण्याचा अल्टिमेटम, भारताचे पाकिस्तानविरुद्ध मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

1 minute ago

कोकणातील माकडे व वानरांचे निर्बीजीकरण करणार!

निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…

45 minutes ago

६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…

57 minutes ago

SRH vs MI, IPL 2025: सनरायजर्स हैदराबादचे मुंबईला १४४ धावांचे आव्हान, क्लासेनची जबरदस्त खेळी

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…

2 hours ago

पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार!

राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…

2 hours ago

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

2 hours ago