कोसळलेल्या पुलाच्या हद्दीवरून रेल्वे, बांधकाम विभागात वाद, नागरिकांकडून नव्या पुलाची मागणी

  128

केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केली अधिकाऱ्यांची कान उघडणी


मनमाड : मनमाड शहरातील दोन भागांना जोडणारा रेल्वे ब्रिज २९ नोव्हेंबरच्या पहाटे पाचच्या सुमारास पुलाकडील भाग पडल्याने इंदोर पुणे महामार्ग पूर्णपणे बंद झाला असून वाहनधारकांचे व स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून सर्वपक्षीय नेत्यांकडून वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही रेल्वे व बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले.


आता या ब्रिजचे दुरुस्तीचे काम सुरू झाले पण स्थानिक नागरिकांनी याला विरोध करत पुलाची नव्याने निर्मिती करण्यात यावी असा एकच हट्ट धरला आहे.


आज या पुलाची पाहणी करण्याकरिता आलेल्या केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधत अधिकाऱ्यांना बे जबाबदार धरत धारेवर धरले. पुलाच्या दुरुस्तीबाबत कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही. दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई देखील केली जाईल, मी सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून तसेच पुलाच्या नवीन निर्मिती बाबत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करून लवकरात लवकर निधी उपलब्ध होईल, त्याचा पाठपुरावा करणार, जनतेला होणाऱ्या त्रासातून लवकरात लवकर मुक्त करणार, असे आश्वासन मंत्री भारती पवार यांनी दिले आहे.


यावेळी पुलाच्या पाहणी दरम्यान मोठ्या संख्येने रेल्वे अधिकारी व बांधकाम विभागाचे अधिकारी व पोलीस प्रशासनास तसेच स्थानिक पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


"पुलाच्या कामाबाबत लवकरात लवकर केंद्रीय व रोड परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा करून निधीबाबत पाठपुरावा करणार व तात्पुरत्या स्वरूपात ब्रिजचे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मुक्त करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना देत अधिकाऱ्यांची कान उघडली केली असून कोणत्याही अधिकाऱ्यांची गाय केली जाणार नाही दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल." - डॉ. भारती पवार, केंद्रीय कुटुंब कल्याण राज्यमंत्री

Comments
Add Comment

Weather Update : पावसाची धडाकेबाज एंट्री! कोकण-घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, मराठवाडा-विदर्भात सतर्कतेचा इशारा, IMD ने दिली माहिती...

मुंबई : यंदाचा ऑगस्ट महिना महाराष्ट्रासह देशासाठी पावसाळी ठरला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तर हा पाऊस

गणेशोत्सवात पुण्यात तीन दिवस मद्यविक्री बंद! कोणत्या तारखांना बंदी?

जुन्नर: गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा पुणे शहर

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंवर मराठा आंदोलकांकडून मारहाणीचा प्रयत्न! कुठे घडली घटना? वाचा नेमके काय घडले

पुरंदर: ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या विरोधात पुरंदर येथे मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात

पुरामुळे पिकं झाले उद्ध्वस्त, वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, हृदयद्रावक Video Viral

लातूर: महाराष्ट्रातील लातूरमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीला आलेली

"सरकारला प्रश्न सोडवायचा आहे, मात्र..." मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत विखे पाटील यांनी केलं स्पष्ट

मुंबई: जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी तसेच त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी

'गोकुळ'ने दूध खरेदी किंमत आणि छोट्या डेअरींसाठीच्या अनुदानात केली वाढ

कोल्हापूर: गोकुळ डेअरी किंवा गोकुळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडने