IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या टी-२० मध्ये खेळणार श्रेयस अय्यर, या युवा खेळाडूंची संघातून सुट्टी

  98

मुंबई: ऑस्ट्रेलियाने(australia) ५ टी-२० सामन्यांची मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाला हरवले. या पद्धतीने त्यांनी मालिकेत २-१ असे पुनरागमन केले आहे. मालिकेतील उर्वरीत २ सामन्यांसाठी श्रेयस अय्यर भारतीय संघाचा भाग असणार आहे. मात्र श्रेयस अय्यरच्या पुनरागमनानंतर कोणत्या खेळाडूला बाहेर बसावे लागेल. खरंतर, या मालिकेत सलामीवीर यशस्वी जायसवाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी आपला जलवा दाखवला आहे. मात्र तिलक वर्मा अपेक्षानुसार कामगिरी करू शकलेला नाही.



श्रेयस अय्यरच्या पुनरागमनानंतर तिलक वर्माची सुट्टी


असे मानले जात आहे श्रेयस अय्यर याच्या पुनरागमनानंतर प्लेईंग इलेव्हनमधून तिलक वर्माची सुट्टी होऊ शकते. म्हणजेच भारतीय संघाच्या टॉप ४मध्ये सलामीवीर यशस्वी जायसवाल यांच्याशिवाय ऋतुराज गायकवाड, इशान किशन आणि श्रेयस अय्यर असतील. तिलक वर्माचे प्लेईंग ११मधून बाहेर असणे निश्चित आहे.



रायपूरमध्ये खेळवला जाणार मालिकेतील चौथा सामना


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना १ डिसेंबरला रायपूरमध्ये खेळवला जाईल. यानंतर दोन्ही संघ मालिकेतील शेवटचा सामना ३ डिसेंबरला आमने सामने असतील. हा सामना बंगळुरूच्या एन चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी