IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या टी-२० मध्ये खेळणार श्रेयस अय्यर, या युवा खेळाडूंची संघातून सुट्टी

मुंबई: ऑस्ट्रेलियाने(australia) ५ टी-२० सामन्यांची मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाला हरवले. या पद्धतीने त्यांनी मालिकेत २-१ असे पुनरागमन केले आहे. मालिकेतील उर्वरीत २ सामन्यांसाठी श्रेयस अय्यर भारतीय संघाचा भाग असणार आहे. मात्र श्रेयस अय्यरच्या पुनरागमनानंतर कोणत्या खेळाडूला बाहेर बसावे लागेल. खरंतर, या मालिकेत सलामीवीर यशस्वी जायसवाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी आपला जलवा दाखवला आहे. मात्र तिलक वर्मा अपेक्षानुसार कामगिरी करू शकलेला नाही.



श्रेयस अय्यरच्या पुनरागमनानंतर तिलक वर्माची सुट्टी


असे मानले जात आहे श्रेयस अय्यर याच्या पुनरागमनानंतर प्लेईंग इलेव्हनमधून तिलक वर्माची सुट्टी होऊ शकते. म्हणजेच भारतीय संघाच्या टॉप ४मध्ये सलामीवीर यशस्वी जायसवाल यांच्याशिवाय ऋतुराज गायकवाड, इशान किशन आणि श्रेयस अय्यर असतील. तिलक वर्माचे प्लेईंग ११मधून बाहेर असणे निश्चित आहे.



रायपूरमध्ये खेळवला जाणार मालिकेतील चौथा सामना


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना १ डिसेंबरला रायपूरमध्ये खेळवला जाईल. यानंतर दोन्ही संघ मालिकेतील शेवटचा सामना ३ डिसेंबरला आमने सामने असतील. हा सामना बंगळुरूच्या एन चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले.

Comments
Add Comment

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव