Arnold Dix : ‘त्या’ ४१ मजुरांचे प्राण वाचवणारे पहिल्यांदा कुठे गेले?

Share

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांची भावनिक प्रतिक्रिया

उत्तरकाशी : उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात काल १७ व्या दिवशी रेस्क्यू टीमला मोठे यश मिळाले. तब्बल ४०० तासांनंतर मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कामगारांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर सव्वा नऊच्या सुमारास सर्व ४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सर्वप्रथम मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बोगद्यातून बाहेर आलेल्या सर्व मजुरांचे पुष्पहार घालून स्वागत केले. वैद्यकीय तपासणीनंतर सर्व कामगारांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून सर्व कामगार निरोगी आहेत.

या सर्व रेस्क्यू ऑपरेशनमध्ये या १७ दिवसात अनेक अडचणी आल्या. मात्र त्यावर मात करत रेस्क्यू टिमने आपले काम सुरु ठेवले. अखेर त्यांना यश मिळाले. आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स (Arnold Dix) म्हणतात, “१७ दिवस शर्थीचे प्रयत्न सुरु होते. अनेक अडचणी आल्या. आम्ही सर्वांनी आपापल्या देवाचा धावा केला होता. अप्रत्यक्षपणे देवाने आम्हाला साथ दिली. या ऑपरेशनमध्ये सेवा करणे हे माझ्यासाठी अभिमानस्पद आहे. तसेच एक पालक म्हणून काम केले. व एक पालक म्हणून सर्व मुलांना त्यांच्या घरी पोहचवण्यास मदत करणे, हे माझ्यासाठी अभिमानस्पद आहे.”

अरनॉल्ड डिक्स पुढे म्हणाले, “सुरुवातीला मी सांगितले होते की, ४१ लोक घरी येणार आहेत. ख्रिसमसला सर्व घरी असतील, कुणालाही दुखापत होणार नाही. आता ख्रिसमस लवकर येत आहे आणि मजूर त्यांच्या घरी असतील. आम्ही शांत होतो आणि आम्हाला नेमके काय हवे आहे हे आम्हाला माहित होते. आम्ही एक अप्रतिम टीम म्हणून एकत्र काम केले. भारताकडे सर्वोत्कृष्ट अभियंते आहेत. या यशस्वी मोहिमेचा एक भाग झाल्याचा मला खूप आनंद आहे.”

“रेस्क्यू मोहिम संपल्यावर पहिल्यांदा मी काल परत चर्चमध्ये गेलो. कारण जे घडले त्याबद्दल मी माझ्या देवाचे आभार मानण्याचे वचन दिले होते. जर तुमच्या लक्षात आले असेल, तर आपण नुकताच एक चमत्कार पाहिला,” असे अरनॉल्ड डिक्स म्हणाले.

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

17 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

17 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

19 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

31 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

36 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

1 hour ago