Virat kohli: वनडे आणि टी२० फॉरमॅटमधून विराटला हवाय अनिश्चितकालीन ब्रेक

मुंबई: विराट कोहलीशी(virat kohli) संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीने बीसीसीआयला सांगितले की त्याला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमधून अनिश्चितकाळासाठी ब्रेक पाहिजे. म्हणजेच त्याला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये खेळायचे नाहीत. दरम्यान, वनडे आणि टी-२० फॉरमॅटबाबत संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचे काय मत आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.



विराट कोहलीला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये का खेळायचे नाही?


इंडियन्स एक्सप्रेसच्या बातमीनुसार,बीसीसीआयने सूत्रांनी सांगितले की विराट कोहलीला कसोटी फॉरमॅटवर लक्ष द्यायचे आहे. याच कारणामुळे त्याला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये खेळायचे नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीने बीसीसीआयला सांगितले की तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी उपलब्ध नाही.


सोबतच तो कधीपर्यंत खेळणार नाही याबाबत काहीच स्पष्ट झालेले नाही. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहली संघात असणार नाही. यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे.



रोहित शर्मा टी-२० फॉरमॅटमध्ये दिसणार?


भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा वनडे आणि टी-२० फॉरमॅटसाठी उपलब्ध असणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली शेवटचा भारतासाठी टी-२० फॉरमॅटमध्ये वर्षभरापूर्वी खेळला होता. दोन्ही खेळाडू टी-२० विश्वचषक २०२२मध्ये दिसले होते. मात्र यानंतर दोघेही भारतासाठी टी२०मध्ये खेळलेले नाहीत.


गेल्या काही दिवसांत विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी शानदार फलंदाजीचा नजराणा सादर केला होता. साधारण ७ महिन्यानंतर टी-२० विश्वचषकाचे आयोजन होत आहे. असे मानले जात आहे की रोहित शर्मा टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो मात्र विराट कोहलीच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.

Comments
Add Comment

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात कोण कितव्या स्थानी ?

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या, न्यूझीलंड दुसऱ्या, दक्षिण आफ्रिका

ऑस्ट्रेलियात इंग्लंडचा विजय, मेलबर्न कसोटी दोन दिवसांत संपली

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या 'ॲशेस' मालिकेतील 'बॉक्सिंग डे' कसोटी

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही.

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पहिल्याच दिवशी मेलबर्नमध्ये ७५ षटकांत २० बळी

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस

भारतीय महिलांचा श्रीलंकेवर एकतर्फी मालिका विजय

शफाली वर्माची ७९ धावांची वादळी खेळी नवी दिल्ली : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा सामना ८ विकेट्सने