Virat kohli: वनडे आणि टी२० फॉरमॅटमधून विराटला हवाय अनिश्चितकालीन ब्रेक

मुंबई: विराट कोहलीशी(virat kohli) संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीने बीसीसीआयला सांगितले की त्याला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमधून अनिश्चितकाळासाठी ब्रेक पाहिजे. म्हणजेच त्याला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये खेळायचे नाहीत. दरम्यान, वनडे आणि टी-२० फॉरमॅटबाबत संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचे काय मत आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.



विराट कोहलीला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये का खेळायचे नाही?


इंडियन्स एक्सप्रेसच्या बातमीनुसार,बीसीसीआयने सूत्रांनी सांगितले की विराट कोहलीला कसोटी फॉरमॅटवर लक्ष द्यायचे आहे. याच कारणामुळे त्याला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये खेळायचे नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीने बीसीसीआयला सांगितले की तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी उपलब्ध नाही.


सोबतच तो कधीपर्यंत खेळणार नाही याबाबत काहीच स्पष्ट झालेले नाही. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहली संघात असणार नाही. यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे.



रोहित शर्मा टी-२० फॉरमॅटमध्ये दिसणार?


भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा वनडे आणि टी-२० फॉरमॅटसाठी उपलब्ध असणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली शेवटचा भारतासाठी टी-२० फॉरमॅटमध्ये वर्षभरापूर्वी खेळला होता. दोन्ही खेळाडू टी-२० विश्वचषक २०२२मध्ये दिसले होते. मात्र यानंतर दोघेही भारतासाठी टी२०मध्ये खेळलेले नाहीत.


गेल्या काही दिवसांत विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी शानदार फलंदाजीचा नजराणा सादर केला होता. साधारण ७ महिन्यानंतर टी-२० विश्वचषकाचे आयोजन होत आहे. असे मानले जात आहे की रोहित शर्मा टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो मात्र विराट कोहलीच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.

Comments
Add Comment

पावसामुळे पाचवा सामना रद्द, भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या

आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने मांडला आशिया कपचा मुद्दा, समस्येवर मार्ग काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई : भारताने आशिया चषक २०२५ जिंकला पण विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय संघाने आशियाई

ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात

पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले

मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.