Virat kohli: वनडे आणि टी२० फॉरमॅटमधून विराटला हवाय अनिश्चितकालीन ब्रेक

  84

मुंबई: विराट कोहलीशी(virat kohli) संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीने बीसीसीआयला सांगितले की त्याला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमधून अनिश्चितकाळासाठी ब्रेक पाहिजे. म्हणजेच त्याला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये खेळायचे नाहीत. दरम्यान, वनडे आणि टी-२० फॉरमॅटबाबत संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचे काय मत आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.



विराट कोहलीला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये का खेळायचे नाही?


इंडियन्स एक्सप्रेसच्या बातमीनुसार,बीसीसीआयने सूत्रांनी सांगितले की विराट कोहलीला कसोटी फॉरमॅटवर लक्ष द्यायचे आहे. याच कारणामुळे त्याला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये खेळायचे नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीने बीसीसीआयला सांगितले की तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी उपलब्ध नाही.


सोबतच तो कधीपर्यंत खेळणार नाही याबाबत काहीच स्पष्ट झालेले नाही. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहली संघात असणार नाही. यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे.



रोहित शर्मा टी-२० फॉरमॅटमध्ये दिसणार?


भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा वनडे आणि टी-२० फॉरमॅटसाठी उपलब्ध असणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली शेवटचा भारतासाठी टी-२० फॉरमॅटमध्ये वर्षभरापूर्वी खेळला होता. दोन्ही खेळाडू टी-२० विश्वचषक २०२२मध्ये दिसले होते. मात्र यानंतर दोघेही भारतासाठी टी२०मध्ये खेळलेले नाहीत.


गेल्या काही दिवसांत विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी शानदार फलंदाजीचा नजराणा सादर केला होता. साधारण ७ महिन्यानंतर टी-२० विश्वचषकाचे आयोजन होत आहे. असे मानले जात आहे की रोहित शर्मा टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो मात्र विराट कोहलीच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.

Comments
Add Comment

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड

Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या