Virat kohli: वनडे आणि टी२० फॉरमॅटमधून विराटला हवाय अनिश्चितकालीन ब्रेक

मुंबई: विराट कोहलीशी(virat kohli) संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीने बीसीसीआयला सांगितले की त्याला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमधून अनिश्चितकाळासाठी ब्रेक पाहिजे. म्हणजेच त्याला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये खेळायचे नाहीत. दरम्यान, वनडे आणि टी-२० फॉरमॅटबाबत संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचे काय मत आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.



विराट कोहलीला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये का खेळायचे नाही?


इंडियन्स एक्सप्रेसच्या बातमीनुसार,बीसीसीआयने सूत्रांनी सांगितले की विराट कोहलीला कसोटी फॉरमॅटवर लक्ष द्यायचे आहे. याच कारणामुळे त्याला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये खेळायचे नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीने बीसीसीआयला सांगितले की तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी उपलब्ध नाही.


सोबतच तो कधीपर्यंत खेळणार नाही याबाबत काहीच स्पष्ट झालेले नाही. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहली संघात असणार नाही. यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे.



रोहित शर्मा टी-२० फॉरमॅटमध्ये दिसणार?


भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा वनडे आणि टी-२० फॉरमॅटसाठी उपलब्ध असणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली शेवटचा भारतासाठी टी-२० फॉरमॅटमध्ये वर्षभरापूर्वी खेळला होता. दोन्ही खेळाडू टी-२० विश्वचषक २०२२मध्ये दिसले होते. मात्र यानंतर दोघेही भारतासाठी टी२०मध्ये खेळलेले नाहीत.


गेल्या काही दिवसांत विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी शानदार फलंदाजीचा नजराणा सादर केला होता. साधारण ७ महिन्यानंतर टी-२० विश्वचषकाचे आयोजन होत आहे. असे मानले जात आहे की रोहित शर्मा टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो मात्र विराट कोहलीच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून