तिहेरी हत्या प्रकरण: महिला आणि २ मुलांना गोळी मारत केली हत्या

  74

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये(Jaipur) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एक महिला आणि दोन मुलांची गोळी झाडून हत्या(murder) करण्यात आली. शहराच्या झालाना परिसरात झालेल्या या हत्याकांडानंतर येथे मोठी खळबळ उडाली. हत्याच्या कारणांचा अद्याप खुलासा झालेला नाही. तिहेरी हत्येची सूचना मिळताच मोठ्या संख्याने पोलीस दल तेथे पोहोचले. प्रकरणाचे गांभीर्य पाहता तेथे मोठ्या प्रमाणात पोलीसफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना झालाना परिसरात बुधवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास झाली. यात एका महिलेसह दोन मुलांना गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती आगीप्रमाणे संपूर्ण परिसरात पसरली. दरम्यान, परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली.


ही हत्या कोणी केली आणि का करण्यात आली याचा अद्याप खुलासा झालेला नाही. घटनास्थळी अधिकारी पोहोचले असून याबाबतचा तपास जोरात सुरू आहे.



घराच्या पहिल्या मजल्यावर जाऊन मारली गोळी


पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हल्लेखोर एकच असल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्लेखोर झालाना परिसरातील सी-टू प्लाझा स्थित एका घरात घुसला. हा हल्लेखोर घराच्या पहिल्या मजल्यावर चढला आणि खोलीत बसलेली महिला तसेच दोन मुलांना गोळी मारून हत्या केली. गोळी लागल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोराने मृत महिलेच्या नणंदेला धक्का देत तेथून फरार झाला. काही समजण्याच्या आत आरोपी तेथून फरार झाला होता.



लोक घरातून आले बाहेर


गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. लोक घरातून बाहेर आले. या दरम्यान, घटना घडलेल्या परिसरातून रडण्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने लोक तेथे पोहोचले. मात्र तेथे महिला आणि तिच्या दोन मलुांचा मृतदेह पडले होते. हे पाहून लोक चांगलेच भयभीत झाले आणि त्यांनी तात्काळ ही सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत व्यक्तींचे मृतदेह ताब्यात घेतले.
Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.