तिहेरी हत्या प्रकरण: महिला आणि २ मुलांना गोळी मारत केली हत्या

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये(Jaipur) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एक महिला आणि दोन मुलांची गोळी झाडून हत्या(murder) करण्यात आली. शहराच्या झालाना परिसरात झालेल्या या हत्याकांडानंतर येथे मोठी खळबळ उडाली. हत्याच्या कारणांचा अद्याप खुलासा झालेला नाही. तिहेरी हत्येची सूचना मिळताच मोठ्या संख्याने पोलीस दल तेथे पोहोचले. प्रकरणाचे गांभीर्य पाहता तेथे मोठ्या प्रमाणात पोलीसफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना झालाना परिसरात बुधवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास झाली. यात एका महिलेसह दोन मुलांना गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती आगीप्रमाणे संपूर्ण परिसरात पसरली. दरम्यान, परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली.


ही हत्या कोणी केली आणि का करण्यात आली याचा अद्याप खुलासा झालेला नाही. घटनास्थळी अधिकारी पोहोचले असून याबाबतचा तपास जोरात सुरू आहे.



घराच्या पहिल्या मजल्यावर जाऊन मारली गोळी


पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हल्लेखोर एकच असल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्लेखोर झालाना परिसरातील सी-टू प्लाझा स्थित एका घरात घुसला. हा हल्लेखोर घराच्या पहिल्या मजल्यावर चढला आणि खोलीत बसलेली महिला तसेच दोन मुलांना गोळी मारून हत्या केली. गोळी लागल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोराने मृत महिलेच्या नणंदेला धक्का देत तेथून फरार झाला. काही समजण्याच्या आत आरोपी तेथून फरार झाला होता.



लोक घरातून आले बाहेर


गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. लोक घरातून बाहेर आले. या दरम्यान, घटना घडलेल्या परिसरातून रडण्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने लोक तेथे पोहोचले. मात्र तेथे महिला आणि तिच्या दोन मलुांचा मृतदेह पडले होते. हे पाहून लोक चांगलेच भयभीत झाले आणि त्यांनी तात्काळ ही सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत व्यक्तींचे मृतदेह ताब्यात घेतले.
Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च