Solapur Crime : शिक्षक हैवान झाला; शिक्षिका पत्नीसह मुलाचा गळा घोटला!

स्वतःही केली आत्महत्या; मात्र कारण गुलदस्त्यात


सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना (Solapur Crime) घडली आहे. एका शिक्षकाने आपल्या पत्नी व मुलाची हत्या (Murder) करुन नंतर आत्महत्या (Suicide) केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये ही घटना घडली. अतुल मुंडे असे हत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव असून त्यांची पत्नीही शिक्षिकाच होती. हे टोकाचे पाऊल त्यांनी का उचलले असावे याचा अद्याप उलगडा झालेला नाही.


घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान आधी पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया पोलिसांकडून समोर आलेली नाही.


याबाबत अधिक माहिती अशी की, बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये अतुल मुंडे (वय ४०) हे आपल्या कुटुंबियांसह राहत होते. त्यांच्या पत्नी तृप्ती अतुल मुंडे (वय ३५)देखील शिक्षका होत्या. अतुल मुंडे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर तृप्ती मुंढे या बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. मात्र, आज अचानक मुंडे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळून आला.


याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासानुसार, अतुल मुंडे यांनी आधी पत्नी तृप्ती यांची गळा कापून हत्या केली. तर मुलगा सुमंत याच्या तोंडावर उशी ठेवून त्याची हत्या केली. त्यानंतर गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. हा संशय असून सर्वच बाजूंनी या घटनेचा तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी