Salt: रोज आपल्या डाएटमध्ये खा फक्त इतकं मीठ आणि बघा कमाल

मुंबई: मीठ हे आपल्या जीवनासाठी गरजेचे आहे. मात्र त्याचे गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास आपल्याला काही आजारांचा सामना करावा लागू शकोतो. मीठाचा सर्वाधिक परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. मीठामध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम आहे. सोडियम आपल्या शरीरात फ्लूड बॅलन्स करण्याचे काम करते. यामुळे मसल्स आणि नर्व्ह काम करतात.


जेव्हा शरीरात सोडियम कमी होते तेव्हा किडनी पाणी धरून ठेवते मात्र जेव्हा सोडियम जास्त असते तेव्हा किडनी मूत्राच्या स्वरूपात बाहेर काढते. मात्र प्रमाणापेक्षा जास्त सोडियम झाल्यास किडनी हे अधिकच सोडियमचा निचरा करण्यास अयशस्वी ठरते. यामुळे सोडियम रक्तात जमा होऊ लागते आणि हे पाणी रोखण्यास सुरूवात करते.


यामुळे रक्ताचा व्हॉल्यूम वाढू लागतो आणि हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात. यामुळे आर्टरीमध्ये दाब निर्माण होऊन अनेक प्रकारचे हृदयाचे आजार तसेच किडनीचे आजार होतात. यासाठी नुकत्यात करण्यात आलेल्या संशोधनानुसार रोजच्या जगण्यात तुम्ही जर दररोज एक चमचा मीठ कमी केल्यास हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना औषधे खाल्ल्याने जितका लाभ मिळत आहे त्यापेक्षा अधिक लाभ मिळेल.



मध्यम वयाचे लोक खातात जास्त मीठ


दररोज एक चमचा मीठ कमी खाल्ल्याने शरीरात अनेक सकारात्मक बदल घडतात. यामुळे हाय ब्लड प्रेशरचे औषध खाल्ल्याने जितका फायदा मिळतो तितका मिळतो तसेच अन्य आजारांची लक्षणेही कमी होतात. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहेच मात्र ज्यांना हा त्रास नाही आहे त्यांनाही हे फायदेशीर आहे.



किती मीठ आहे गरजेचे


जागतिक आरोग्य संघटनेनुसार एका वयस्कर व्यक्तीने दररोज ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठाचे सेवन केले पाहिजे. यात २ ग्रॅम सोडियम आणि ३.५ ग्रॅम पोटॅशियम असले पाहिजे. मात्र जगभरातील अधिकांश लोक ९ ते १२ टक्के मीठाचे सेवन करतात. आजकाल जितके प्रोसेस्ड फूड जसे पिझ्झा, बर्गरमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असते. यामुळे आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.

Comments
Add Comment

दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी उड्डाणपुलाचे काम ७५ टक्के पूर्ण

येत्या ३१ मे २०२६पर्यंत होणार वाहतुकीसाठी पूल खुले मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प

मुंबईत रस्त्यांच्या दुतर्फा विजेच्या खांबावर अनधिकृत बॅनर

मुंबई महापालिकेच्या परवाना विभागात ३ पोलिस ठाण्यात एफआयआर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ अभिनव, खर्चमुक्त उपक्रम

मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गृह विभाग तसेच परिवहन विभागाच्या सहकार्याने

मुंबईच्या नव्या महापौरांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे राणीबागेतला महापौर बंगला

मुंबई : मुंबई महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मुंबई महापालिकेत भाजपा

मुंबईत मंगळवारपासून पुढील सात दिवस शहर आणि पूर्व उपनगरात १० टक्के पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱया पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’च्या

Mahalakshmi Bridge : रेल्वे रुळांवरून धावणार पालिकेचा पहिला 'केबल-स्टेड' पूल; ५५% काम फत्ते; सात रस्ता, महालक्ष्मी...अजून कुठे कुठे? पाहा नेमका मार्ग

मुंबई : दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे