Salt: रोज आपल्या डाएटमध्ये खा फक्त इतकं मीठ आणि बघा कमाल

मुंबई: मीठ हे आपल्या जीवनासाठी गरजेचे आहे. मात्र त्याचे गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास आपल्याला काही आजारांचा सामना करावा लागू शकोतो. मीठाचा सर्वाधिक परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. मीठामध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम आहे. सोडियम आपल्या शरीरात फ्लूड बॅलन्स करण्याचे काम करते. यामुळे मसल्स आणि नर्व्ह काम करतात.


जेव्हा शरीरात सोडियम कमी होते तेव्हा किडनी पाणी धरून ठेवते मात्र जेव्हा सोडियम जास्त असते तेव्हा किडनी मूत्राच्या स्वरूपात बाहेर काढते. मात्र प्रमाणापेक्षा जास्त सोडियम झाल्यास किडनी हे अधिकच सोडियमचा निचरा करण्यास अयशस्वी ठरते. यामुळे सोडियम रक्तात जमा होऊ लागते आणि हे पाणी रोखण्यास सुरूवात करते.


यामुळे रक्ताचा व्हॉल्यूम वाढू लागतो आणि हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात. यामुळे आर्टरीमध्ये दाब निर्माण होऊन अनेक प्रकारचे हृदयाचे आजार तसेच किडनीचे आजार होतात. यासाठी नुकत्यात करण्यात आलेल्या संशोधनानुसार रोजच्या जगण्यात तुम्ही जर दररोज एक चमचा मीठ कमी केल्यास हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना औषधे खाल्ल्याने जितका लाभ मिळत आहे त्यापेक्षा अधिक लाभ मिळेल.



मध्यम वयाचे लोक खातात जास्त मीठ


दररोज एक चमचा मीठ कमी खाल्ल्याने शरीरात अनेक सकारात्मक बदल घडतात. यामुळे हाय ब्लड प्रेशरचे औषध खाल्ल्याने जितका फायदा मिळतो तितका मिळतो तसेच अन्य आजारांची लक्षणेही कमी होतात. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहेच मात्र ज्यांना हा त्रास नाही आहे त्यांनाही हे फायदेशीर आहे.



किती मीठ आहे गरजेचे


जागतिक आरोग्य संघटनेनुसार एका वयस्कर व्यक्तीने दररोज ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठाचे सेवन केले पाहिजे. यात २ ग्रॅम सोडियम आणि ३.५ ग्रॅम पोटॅशियम असले पाहिजे. मात्र जगभरातील अधिकांश लोक ९ ते १२ टक्के मीठाचे सेवन करतात. आजकाल जितके प्रोसेस्ड फूड जसे पिझ्झा, बर्गरमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असते. यामुळे आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.

Comments
Add Comment

Mumbai BJP President MLA Amit Satam : बीएमसीकडून सर्व आरोग्यविषयक खरेदी GeM पोर्टलद्वारे केली जाणार – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

बीएमसी रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांची रिअल-टाइम माहिती दर्शविण्यासाठी ऑनलाइन डॅशबोर्ड विकसित केला जाणार;

Middle East War : युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत १७ टक्क्यांची घसरण

मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय

Pod Taxi : लवकरच मुंबईत धावणार भारतातील पहिली 'पॉड टॅक्सी'

मुंबई : मुंबई शहरं हे कधीच विश्रांती घेत नाही इथे २४ तास सतत वर्दळ पाहायला मिळते असते. मुंबईत लोकांची गर्दी

Bmc News : मुंबईत ई-कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा

महापालिकेत ठरावाच्या सूचनेद्वारे झाली मागणी मुंबई : शहरात झपाट्याने वाढणाऱ्या ई-कचऱ्याच्या समस्येवर तोडगा

Ashwini Bhide : रस्ते सिमेंटीकरण कामांना कोणतीही मुदतवाढ नाही

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या

BMC News : मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डयांच्या दुरुस्ती खर्चात ७५ टक्के घट

तब्बल २०२ कोटींवरुन खर्च आता अंदाजे ४४ कोटींवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या