IND vs AUS 3rd T20 : मॅक्सवेलचे झुंजार शतक, अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा विजय

गुवाहाटी: शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून ठेवणाऱ्या अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने(australia) भारतावर मात केली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला ५ विकेटनी हरवले. ग्लेन मॅक्सवेलचे झुंजार नाबाद शतक ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले. ग्लेन मॅक्सवेलने ४८ चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी केली. यात त्याने ८ चौकार आणि ८ षटकार ठोकले.


शेवटच्या एका चेंडूत ऑस्ट्रेलियाला २ धावांची गरज असताना मॅक्सवेलने प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलवर चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यासोबतच ऑस्ट्रेलियाने मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत आता भारत २ आणि ऑस्ट्रेलिया १ अशा गुणसंख्येवर आहे. त्यामुळे पुढील २ सामने निर्णायक ठरणार आहेत.


तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजी करण्यास उतरलेल्या भारतीय संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने २२२ धावांचा टप्पा गाठला होता. ऑस्ट्रेलियासाठी हे आव्हान नक्कीच मोठे होते मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी जबरदस्त खेळी करताना भारताचे हे आव्हान परतून लावले.


भारताकडून ऋतुराज गायकडवाने ५७ बॉलमध्ये १३ चौकार आणि ७ षटकारांच्या जोरावर नाबाद १२३ धावा केल्या. मात्र त्याच्या या धावा भारताला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. सलामीला आलेला यशस्वी जायसवाल ६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेला इशान किशन भोपळा न फोडताच पॅव्हेलियनमध्ये गेला. दोन फलंदाज झटपट परतल्यानंतर भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने पिचवर आपले पाय जमवले आणि जोरदार फटकेबाजी सुरू केली.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे