IND vs AUS 3rd T20 : मॅक्सवेलचे झुंजार शतक, अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा विजय

  83

गुवाहाटी: शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून ठेवणाऱ्या अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने(australia) भारतावर मात केली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला ५ विकेटनी हरवले. ग्लेन मॅक्सवेलचे झुंजार नाबाद शतक ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले. ग्लेन मॅक्सवेलने ४८ चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी केली. यात त्याने ८ चौकार आणि ८ षटकार ठोकले.


शेवटच्या एका चेंडूत ऑस्ट्रेलियाला २ धावांची गरज असताना मॅक्सवेलने प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलवर चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यासोबतच ऑस्ट्रेलियाने मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत आता भारत २ आणि ऑस्ट्रेलिया १ अशा गुणसंख्येवर आहे. त्यामुळे पुढील २ सामने निर्णायक ठरणार आहेत.


तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजी करण्यास उतरलेल्या भारतीय संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने २२२ धावांचा टप्पा गाठला होता. ऑस्ट्रेलियासाठी हे आव्हान नक्कीच मोठे होते मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी जबरदस्त खेळी करताना भारताचे हे आव्हान परतून लावले.


भारताकडून ऋतुराज गायकडवाने ५७ बॉलमध्ये १३ चौकार आणि ७ षटकारांच्या जोरावर नाबाद १२३ धावा केल्या. मात्र त्याच्या या धावा भारताला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. सलामीला आलेला यशस्वी जायसवाल ६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेला इशान किशन भोपळा न फोडताच पॅव्हेलियनमध्ये गेला. दोन फलंदाज झटपट परतल्यानंतर भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने पिचवर आपले पाय जमवले आणि जोरदार फटकेबाजी सुरू केली.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला