IND vs AUS 3rd T20 : मॅक्सवेलचे झुंजार शतक, अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा विजय

गुवाहाटी: शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून ठेवणाऱ्या अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने(australia) भारतावर मात केली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला ५ विकेटनी हरवले. ग्लेन मॅक्सवेलचे झुंजार नाबाद शतक ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले. ग्लेन मॅक्सवेलने ४८ चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी केली. यात त्याने ८ चौकार आणि ८ षटकार ठोकले.


शेवटच्या एका चेंडूत ऑस्ट्रेलियाला २ धावांची गरज असताना मॅक्सवेलने प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलवर चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यासोबतच ऑस्ट्रेलियाने मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत आता भारत २ आणि ऑस्ट्रेलिया १ अशा गुणसंख्येवर आहे. त्यामुळे पुढील २ सामने निर्णायक ठरणार आहेत.


तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजी करण्यास उतरलेल्या भारतीय संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने २२२ धावांचा टप्पा गाठला होता. ऑस्ट्रेलियासाठी हे आव्हान नक्कीच मोठे होते मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी जबरदस्त खेळी करताना भारताचे हे आव्हान परतून लावले.


भारताकडून ऋतुराज गायकडवाने ५७ बॉलमध्ये १३ चौकार आणि ७ षटकारांच्या जोरावर नाबाद १२३ धावा केल्या. मात्र त्याच्या या धावा भारताला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. सलामीला आलेला यशस्वी जायसवाल ६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेला इशान किशन भोपळा न फोडताच पॅव्हेलियनमध्ये गेला. दोन फलंदाज झटपट परतल्यानंतर भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने पिचवर आपले पाय जमवले आणि जोरदार फटकेबाजी सुरू केली.

Comments
Add Comment

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील

Ben Austin Dies News : एक चेंडू, सराव आणि जीवन संपलं…भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी १७ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलिया : सध्या भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२०

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ? जाणून घ्या नियम

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ ची दुसरी सेमी फायनल आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये

भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या T- २० मॅच च्या आधी वाईट बातमी, युवा खेळाडूचा बॉल लागून मृत्यू

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ कांगारूं विरुद्ध पाच टी - २० सामन्यांची मालिका खेळत आहे. या

Shreyas Iyer Health Update : 'स्टार बॅट्समन' श्रेयस अय्यरकडून मोठी अपडेट! गंभीर दुखापतीनंतर ICU मधून भावनिक पोस्ट, चाहत्यांना दिलासा!

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज (Star Batsman) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या एका गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात उपचार घेत आहे.