Unseasonal Rain : अवकाळीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावली तातडीची बैठक

केंद्राकडे मदतीसाठी पाठवणार प्रस्ताव


मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्याच्या विविध भागांत पडलेल्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) तडाखा आणि गारपिटीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही भागात गारांसह पाऊस झाल्यामुळे शेती पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अवकाळीच्या आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा एकदा फुटला आहे. राज्यातील ही बिकट परिस्थिती लक्षात घेऊन नुकसान झालेल्या भागांची माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.


अवकाळीच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या उपस्थितीत राज्यातील नुकसानाचा आढावा घेतला जाणार आहे. पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर केंद्राकडून अवकाळी आणि गारपिटीने फटका बसलेल्या शेतीला मदत मिळवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.


राज्य सरकारकडून सध्या केंद्र सरकारकडे चाळीस दुष्काळी तालुक्यांसाठी २६०० कोटींच्या मदतीची मागणी केली आहे. पुढील दहा दिवसात राज्यातील नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे तयार करून अहवाल सादर करण्याचे सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या भागाचा अहवाल प्राप्त होताच केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

प्रारुप मतदार यादीबाबत १०,६६८ तक्रारींचे निवारण

कंट्रोल चार्टद्वारे मतदार यादीची केली जाते पडताळणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता